HW News Marathi
Covid-19

राज्यात गेल्या २४ तासांत ५,१२३ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई | राज्यात गेल्या २४ तासांत २,८४० नवे रुग्ण आढळले आहेत. तर ५,१२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.राज्यात एकूण १६ लाख २३ हजार ५०३ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट ९२.६४ टक्के इतका झाला आहे. तर राज्यात मागील २४ तासांमध्ये ६८ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
मुंबईत आज ५४१ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. तर १५६५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील २४ तासांमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आत्तापर्यंत एकूण २ लाख ७० हजार ६५४ जणांना करोनाची बाधा झाली. ज्यापैकी २ लाख ४७ हजार ३३९ जण हे करोनातून बरे झाले आहेत. तर आत्तापर्यंत मुंबईत १० हजार ५९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज घडीला मुंबईत ८ हजार ९४६ ॲक्टिव केसेस आहेत.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज १४ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित, तर ३३९ जणांचा मृत्यू

News Desk

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा

News Desk

जगात कोरोनाची लस घेणाऱ्या पहिल्या पुरुषाचा झाला मृत्यू

News Desk