HW News Marathi
Covid-19

मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील, रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयाकडे लक्ष 

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरु असलेल्या अनलॉकच्या प्रक्रियेमुळे आता हळूहळू जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल सेवाही सुरळीत करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मुंबई लोकल सेवा आता सर्वसामान्यांसाठीही सुरु करावी अशी मागणी राज्य सरकारने पत्राद्वारे रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे. त्यामुळे आता रेल्वे मंत्रालयाकडून याबाबत नेमका काय निर्णय घेतला जातो हे पाहणे महत्त्वाचे आहे. रेल्वे मंत्रालय सकारात्मक असल्यास लवकरच मुंबईत लोकल सेवा सर्वसामान्यांसाठीही सुरु होईल.

राज्य सरकारकडून आतापर्यंत मुंबईतील लोकल सेवा ही केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि सर्वसामान्य महिलांसाठी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, आता लवकरात लवकरच ही लोकलसेवा सर्वांसाठीच सुरु व्हावी जेणेकरून प्रवासाची समस्या सुटेल अशी मागणी होत आहे. दुसरीकडे कोरोनाचा धोका कायम असल्याने लोकलची गर्दी आणि कोरोनाचे नियम लक्षात घेणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने सर्वांना लोकलमधून प्रवास करता यावा यासाठी एक प्रस्ताव तयार केला आहे.

राज्य सरकारचा प्रस्ताव काय ?

राज्य सरकारने दिलेल्या या प्रस्तावानुसार, सकाळी आणि संध्याकाळी मुंबईतील ऐन गर्दीच्या वेळी म्हणजेच सकाळी ८ वाजल्यापासून ते सकाळी १०.३० वाजेपर्यंत त्याचप्रमाणे संध्याकाळी ५ वाजल्यापासून ते संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत केवळ ओळखपत्र आणि क्यूआर कोड असलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची परवानगी दिली जाईल. तर ज्या वेळेत फार गर्दी नसेल अशा वेळेत म्हणजेच सकाळी पहिल्या लोकलपासून ते सकाळी ७.३० वाजेपर्यंत, सकाळी ११ वाजल्यापासून ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत त्याचप्रमाणे रात्री ८ वाजल्यापासून ते शेवटच्या लोकलपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

श्रमिकांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत आपापल्या राज्यांत पोहोचवले जात आहे

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये मांडलेले ‘हे’ मुद्दे

News Desk

देशात रुग्ण बरे होण्याचा दर २३.३ %, तर कोरोनाबाधितांचा आकडा २९, ४३५

News Desk