HW News Marathi
महाराष्ट्र

सांगलीच्या व्यक्तींचा मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट, प्रशासनाची चिंता वाढली

सांगली | सांगली कोरोनामुक्तच्या मार्गाने वाटचाल करत होता. मात्र, सांगली जिल्ह्यातील रेठेधरण परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या संपर्कातील २४ जणांना मिरजमधील रुग्णालयात ठेवण्यात आले असून त्या सर्वजणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील रेठे धरणमधील एका व्यक्तीची कोरोना चाचणी मुंबईत पॉझिटिव्ह आली. तसेच हा व्यक्ती सांगली जिल्ह्यातील रेठेधरण गावात जाऊन आल्यामुळे हे गावही सील करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

सांगली जिल्ह्यातील रेठे धरणामधील व्यक्ती मुंबईला जाण्यापूर्वी आजारी होता. त्यावेळी त्याच्यावर इस्लामपूरमधील एका डॉक्टरने उपचार केले. त्यानंतर तो मुंबईला आला. मात्र, या व्यक्तीने मुंबईत येऊन कोरोनाची चाचणी केल्यानंतर त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ही आले. यामुळे त्यांच्या संपर्कात आलेले २५ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. नुकतेच २६ रुग्णापैकी २४ कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ही आल्याने होते. यामुळे सांगली जिल्हा कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत होता. मात्र, सांगली प्रशासनाची चिंता वाढली आहे.

देशातील कोरोना बाधितांचा आकडा ८ हजारापेक्षा जास्त झाला आहे. तर महाराष्ट्र कोरोनाग्रस्तांची संख्या १९८२ वर पोहोचली आहे तर एकट्या मुंबई २२१ नवी रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत उपचारानंतर २१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशमुख, परमबीरांचं कुठे हनीमून सुरू आहे ते शोधा! फडणवीसांचा हल्लाबोल

News Desk

मुंबईच्या हद्दीत ८ मार्चपर्यंत जमावबंदी आदेश जारी

Aprna

….आणि सुशीलकुमार शिंदेंनी होणारे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोलेंचे नाव घेतले

News Desk