HW News Marathi
Covid-19

कोरोनामुळे राज्यातील 70 हजार जागांच्या नोकर भरतीला स्थगिती

मुंबई | राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, संपूर्ण जग सध्या लॉकडाऊन असताना सर्वच क्षेत्रांना याचा फटका बसला आहे. कोरोनामुळे अर्थचक्र एकाच जागी रुतून राहिलेले असताना राज्य सरकारपुढे सध्या हे मोठे आव्हान आहे. एकीकडे हे आर्थिक संकट असताना आता राज्य सरकारकडून रखडलेल्या तब्बल ७० हजार जागांच्या मेगाभरतील आता स्थगिती देण्यात आली आहे. राज्यातील आर्थिक स्थिती जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत राज्यात नव्याने कोणत्याही प्रकारची नोकरभरती होणार नसल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात आधीच निधीची कमतरता असताना कोरोनाच्या संकटामुळे राज्याला अधिक आर्थिक चणचण भासत आहे.

अर्थ मंत्रालयाकडून अन्य सर्व विभागांच्या निधीमध्ये कपात करण्यात आली आहे. तर अनेक योजना देखील रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, शक्य तिथे काटकसर करण्याचा इशारा देखील अर्थ विभागाकडून देण्यात आला आहे. याचा मोठा फटका राज्यातील नोकरभरतीला बसणार आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात रखडलेली ७० हजार जागांची नोकर भरती कोरोनाच्या संकटामुळे रखडून राहिली होती. त्यातच आता राज्यावर असलेले आर्थिक संकट आणि कोरोनानंतरचे आव्हान पाहता हा नोकर भरतीचा निर्णय स्थगित करण्यात निर्णय घेण्यात आला आहे.

विभागानुसार रिक्त पदांची संख्या

  • ग्रामविकास : 11000
  • गृह विभाग : 7111
  • कृषी विभाग : 2500
  • पशु व दुग्ध संवर्धन विभाग : 1047
  • सार्वजनिक बांधकाम : 8330
  • जलसंपदा : 8220
  • जलसंधारण 2433
  • नगरविकास : 1500
  • आरोग्य : 10,560
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीड जिल्ह्यात ८ नवे कोरोनाबाधित, सर्वच जण मुंबई-पुण्याहून आलेले

News Desk

खडसे, पंकजा, बावनकुळे, तावडे ‘ही’ मंडळी अस्वस्थ, नव्या भूकंपाची वात पेटू नये !

News Desk

मुंबईसह राज्यासमोर आता चक्रीवादळाचे संकट

News Desk