HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रातही सर्वांनी कोरोनाची लस मोफतच ! ही घोषणा करत मालिकांची भाजपवर टीका

मुंबई । देशभरात सध्या बिहार विधानसभा निवडणूकीची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने मतदारांना आपली सत्ता आल्यास कोरोनाची लस मोफत देण्याच्या दिलेल्या आश्वासनामुळे राजकीय वर्तुळातून संताप व्यक्त होतो आहे. भाजपवर यावरून मोठ्या प्रमाणात टीका देखील करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर, “भाजप कोरोनाची लस लोकांचे जीव वाचवण्यासाठी देणार आहे की निवडणुका जिंकण्यासाठी ?” असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

“भाजपने कोरोना लसीचेही राजकारण केले. सर्व राज्यांना मोफत लस देणे ही केंद्राची जबाबदारीच आहे. भाजप कोरोनाची लस लोकांचे जीव वाचवण्यासाठी देणार आहे की निवडणुका जिंकण्यासाठी ?”, असा संतप्त सवाल यावेळी नवाब मलिक यांनी उपस्थित आहे. जरी भाजपचा निवडणुकांमध्ये पराभव झाला तरीही संपूर्ण देशातील नागरिकांना लस मोफतच मिळणार आहे. महाराष्ट्रातही सर्वांनी ही कोरोनाची लस मोफत देण्यात येईल”, असे नवाब मलिक म्हणाले. नवाब मलिक यावेळी औरंगाबादमध्ये बोलत होते. नवाब मलिक यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही भाजपवर टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

फडणवीसांचे सोनिया गांधींना पत्र, म्हणाले…”ये पब्लिक है, सब जानती है!”

News Desk

विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्माचाऱ्यांना पगार न दिल्यास त्यांची मान्यता होणार रद्द !

News Desk

“माझं गाव कोरोनामुक्त हे जनतेनं करायचं, तर मग आपण काय करणार?”, भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल

News Desk