HW News Marathi
महाराष्ट्र

#coronavirus : राज्यात पाच जणांचा मृत्यू, दिवसभरातला ‘कोरोना’चा दुसरा बळी

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याचबरोबर कोरोना राज्यातील मृतांच्या आकड्यातही वाढ होत आहे. कोरोनामुळे मुंबईत आता आणखी एक बळी गेला आहे. ६३ वर्षीय महिलेचा मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात एका दिवसात दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनामुळे मृतांचा आकडा ५ वर गेला आहे. तर देशातील कोरोना बळींची संख्या आता १४ वर पोहोचली आहे.

दरम्यान, आज (२६ मार्च) सकाळी नवी मुंबईतही एका ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. नवी मुंबईतील पीडित महिला वाशी इथली रहिवासी होती. तिच्यावर आधी खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर तिला कोरोनावरील उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२६ वर पोहोचली आहे. सिंधुदुर्गमधील कणकवलीत पहिला रुग्ण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्या या कोरोनाबाधित रुग्णाची माहिती दिली आहे तर मुंबई-ठाण्यात प्रत्येकी एका नव्या रुग्णाला ‘कोरोना’ची लागण झाली आहे. तर तिकडे नागपुरातही एक नवा रुग्ण आढळला आहे. काल (२५ मार्च) दिवसभरात १५ नवे रुग्ण आढळल्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या १२२ वर गेली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मला शरद पवारांना भेटायला आवडतं’, पवारांच्या भेटींबाबत राऊतांच भाष्य

News Desk

उद्धव ठाकरेंना कुणी मुख्यमंत्री मानत नाही, फडणवीसांची ठाकरेंवर जळजळीत टीका!

News Desk

रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटी रुपयांची मदत तोकडी ठरेल

News Desk