HW News Marathi
देश / विदेश

#CoronaVirus | मुख्यमंत्र्यांचे काम चांगलेच पण आम्हालाही विश्वासात घ्यायला हवे !

मुंबई | देशासह राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात तासागणिक होणारी वाढ ही चिंतेचा विषय ठरत आहे. केंद्र आणि राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सवर्तोपरी प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामाचे कौतुक करत एक सूचना देखील केली आहे. “कोरोनासारख्या संकट समयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षासह सर्व पक्षांना विश्वासात घ्यायला हवे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घ्यायला पाहिजे होती. कोरोनाशी लढण्यासाठी विरोधी पक्षही सरकार सोबत आहे. मुख्यमंत्र्यांनी या पार्श्वभूमीवर आता राज्यात सर्वपक्षीय बैठक आयोजित केली पाहिजे”, अशी सूचना रामदास आठवलेंनी केली आहे.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ‘कोरोना’ व्हायरससोबत लढताना चांगले काम करीत आहेत. मात्र, राज्यावर जर एखादे मोठे संकट आले असेल तर राज्यातील विरोधी पक्ष आणि सर्व पक्षाच्या नेत्यांचा सल्ला घेण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. कोरोनाच्या या महासंकटाचा मुकाबला करण्यासाठी आम्ही एकजुटीने सरकारसोबत आहोत. विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माझा रिपब्लिकन पक्ष आम्ही सर्व एकजुटीने कोरोनाच्या मुकाबला करण्यासाठी सरकार सोबत आहोत. त्यामुळे, आता याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक लवकर आयोजित करावी”, अशी सूचना रामदास आठवलेंनी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री आता याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप नेते वसीम बारी यांची अतिरेक्यांनी केली हत्या

News Desk

बजरंग दलाचे माजी नेते बाबू बजरंगी यांची जन्मठेप कायम

News Desk

‘… तर सीरम इन्स्टिट्यूटमधून एकही ट्रक महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही’

News Desk