HW News Marathi
देश / विदेश

#CoronaVirus : प्रिय पंतप्रधानजी, सरकार गंभीर असेल तरच जनताही गंभीर !

मुंबई | देशातील कोरोनाचा प्रार्दुर्भाव लक्षात घेत महाराष्ट्र जमाव बंदी ( कलम १४४) लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. मुख्यमंत्र्यांनी काल (२२ मार्च) मध्य रात्रीपासून राज्यात जमाव बंदी ( कलम १४४) लागू केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल जनता कर्फ्यूची घोषणा केल्याप्रमाणे तो उत्तम प्रतिसाद मिळाला. या जनता कर्फ्यूदरम्यान देशवासियांना घरात राहिले. कोरोनाविरोधात लढणाऱ्या डॉक्टर, नर्स, पोलिसांचे काल सायंकाळी पाच वाजता टाळ्या, घंटानाद आणि थाळी वाजवित त्याचे आभार मानले. यानंतर मोदींनी आज (२३ मार्च) ट्वीट करत देशवासियांवर नाराजी व्यक्त केली आहे.

मोदींनी ट्वीटमध्ये म्हटले की, नागरिकांनी लॉकडाऊन गंभीर्यानी घेतलेले दिसत नाही. कृपा करून स्वत:ला व आपल्या कुटुंबाला वाचवा, राज्य सरकारने दिलेल्या निर्देशाचे पालन करा. आणि मी राज्य सरकाला सांगू इच्छतो की, नागरिकांकडून नियम आणि कायद्याचे पालन करून घ्या, असे म्हणत त्यांनी देशवासियांच्या वार्तवणुकीवर नाराजी व्यक्त केली. मोदींच्या ट्वीटवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीटद्वारे त्यांच्यावर टीका केली. राऊत म्हणाले की, आपल्या पंतप्रधानांना चिंता वाटू लागली आहे. की, देशातील जनता लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नाही. प्रिय पंतप्रधानजी, तुम्ही भीती आणि चिंतेच्या वातावरणात उत्सवाचे वातावरण निर्माण करणार तर असेच होणार ?, सरकार गंभीर असेल तरच जनताही गंभीर, असा टोला त्यांनी मोदींना लगावला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रासह तीन राज्यात नीट परिक्षेचा गोंधळ

News Desk

मोदी सरकारने काँग्रेसला संपवण्यासाठी सर्व प्रयत्न केले | सोनिया गांधी

News Desk

नरेंद्र मोदींचा पुन्हा एकदा काँग्रेसवर संतापले!

News Desk