HW News Marathi
महाराष्ट्र

#CoronaVirus : ठाकरे सरकारने आज घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर ही चार शहरे आजमध्य रात्रीपासून येत्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. या शहरांमध्ये अन्नधान्य, दूध, किराणा, औषधं, वैद्यकीय सुविधा, बँक अशा जीवनावश्यक गोष्टी वगळता सर्व दुकाने बंद असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२० मार्च )सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेला संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोनापासून बचावसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

“मुंबई प्रधिकरण क्षेत्रात ही बंदी लागू आहे. या क्षेत्रात नवी मुंबई, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकेच्या क्षेत्राचा समावेश आहे. या क्षेत्रात ही बंदी लागू आहे. सर्व कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानगी द्यावी,” असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. रेल्वे आणि बस मुंबई शहराच्या रक्तवाहिन्या आहेत, त्या बंद करणे सोपे आहे, परंतु पालिका, स्वच्छता, आरोग्य अशा अत्यावश्यक कर्मचारीवर्गाची गैरसोय होईल. त्यामुळे तूर्तास रेल्वे आणि बस सेवा बंद करणार नाही, असे मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केले

पहिली ते आठवीपर्यंतची परीक्षा रद्द

महाराष्ट्रातील पहिली ते आठवीपर्यंतची परीक्षा रद्द करण्यात आल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले. तर नववी आणि अकरावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर होणार आहे. दहावीच्या वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही. कालच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी २९ मार्चला होणारी सीईटीची परीक्षा ३० एप्रिलला पुढे ढकलली.

मुख्यमंत्र्यांनी केल्या महत्त्वाच्या घोषणा केल्या

  • लोकल आणि बसेस बंद नाही करणार. मात्र गर्दी कमी न झाल्यास हा निर्णय घेण्यात येईल.
  • अन्नधान्य, दूध, मेडिकल ही दुकाने सुरू राहणार.
  • सरकारी कार्यालयात फक्त 25 टक्के कर्मचारी.
  • वर्क फ्रॉम होम न करणाऱ्या खाजगी कंपन्या बंद कराव्यात
  • आर्थिक अडचणी भासू नयेत यामुळं सर्व बॅंका सुरू राहणार आहेत.
  • जीवनावश्यक वस्तू सोडून बाकी सर्व सेवा 31 मार्चपर्यत बंद
  • मुंबई-पुणे नागपुरात सर्व दुकाने बंद
  • सुट्टी समजून बाहेर फिरू नका. ही सुट्टी नव्हे स्वतः वर टाकलेली बंधन आहेत. सरकारला सहकार्य करा.
  • हातावर पोट असलेल्या लोकांचे वेतन बंद होणार नाहीत
  • पुढचे १५-२० दिवस अत्यंत महत्वाचे आहे. संसर्ग टाळणे महत्वाचे आहे.

 

 

 

 

 

 

 

.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पक्षशिस्त मोडल्याने नाना पटोलेंनी काँग्रेस महासचिवांना निलंबित केलं!

News Desk

महाराष्ट्रात भाजपचे सरकार होऊ नये !

News Desk

योगी सरकारने कोणाच्यातरी आडून राजकारण करणे थांबवावे, अमोल कोल्हेंची हाथरस प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया

News Desk