HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणेंच्या टीकेवर आता अजित पवारांचं प्रत्युत्तर! म्हणाले…..

पुणे। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनाशीर्वाद यात्रेचा आज(29 ऑगस्ट) शेवटचा दिवस आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. नारायण राणे आणि शिवसेना हा वाद महाराष्ट्रात काही नवीन नाही. आता नारायण राणेंनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे. नारायण राणेंनी “अजित पवार अजून अज्ञान आहेत. आपल्या खात्याचं बघा. अजून मी राष्ट्रवादीकडे अद्याप वळलेलो नाही. आपल्यावरील आरोप किंवा केसेस कशा काढायच्या हे अजित पवारांकडून शिकलं पाहिजे” अशी टीका करत इशारा दिला होता. त्याला आता अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आम्ही राज्यात मंत्री आहोत,त्यांनी केंद्राची कामे करावी

केसेस कशा रद्द करायच्या हे अजित पवार यांच्याकडून शिकावं, असा टोला केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी लगावला होता. त्यावर पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मला त्याबद्दल जास्त बोलायचं नाही. मला नारायण राणे बाबत चर्चा करायची नाही. त्यांचं त्यांना लखलाभ. आम्हाला सरकार चालवायच आहे. ते केंद्रात मंत्री आहेत. आम्ही राज्यात मंत्री आहोत. त्यांनी केंद्राची कामे करावी, आम्ही राज्यातील कामं करणार, असं ते म्हणाले आहेत.

“सूक्ष्म आणि लहानमध्ये काय निधी मिळणार आहे?. निधी द्यायचं बोललं तर गडकरी साहेबाचं मंत्रालय देऊ शकतं. गडकरी साहेबांनी यापूर्वी निधी दिला आहे. काम पण चालली आहेत. या खात्याचं पूर्वी नाव अवजड खातं होतं. काही लोकं त्याला गंमतीने अवघड खातंही म्हणायचे. आता त्याच्या नावात काही बदल झाले आहेत. आता करोनाचं संकट आल्याने सुक्ष्म आणि लघू खूप सारे उद्योग अडचणीत आले आहेत. देशातील छोट्या उद्योगांसाठी एखादा निर्णय घेत येत असावा, असं वाटतं”, असं टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला होता.

काय म्हणाले नारायण राणे?

अजित पवार अजून अज्ञान आहेत

नारायण राणे यांनी या जनाशीर्वाद यात्रेत सरकारवर टीका केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर देखील निशाणा साधला आहे. नारायण राणे यांनी अजित पवार यांच्या टिकेचा समाचार घेतला. ‘अजित पवार अजून अज्ञान आहेत. आपल्या खात्याचं बघा. अजून मी राष्ट्रवादीकडे अद्याप वळलेलो नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. ‘आपल्यावरील आरोप किंवा केसेस कशा काढायच्या हे अजित पवारांकडून शिकलं पाहिजे,’ असेही ते म्हणाले आहेत.

निधी द्यायचं बोललं तर गडकरी साहेबाचं मंत्रालय देऊ शकते,‘सूक्ष्म आणि लहानमध्ये काय निधी मिळणार आहे?. निधी द्यायचं बोललं तर गडकरी साहेबाचं मंत्रालय देऊ शकते. गडकरी साहेबांनी यापूर्वी निधी दिला आहे. कामे पण चालली आहेत. या खात्याचं पूर्वी नाव अवजड खातं होते. काही लोकं त्याला गंमतीने अवघड खातंही म्हणायचे. आता त्याच्या नावात काही बदल झाले आहेत.’ अशी टीका अजित पवार यांनी केली होती. तसेच ‘आता करोनाचं संकट आल्याने सुक्ष्म आणि लघू खूप सारे उद्योग अडचणीत आले आहेत. देशातील छोट्या उद्योगांसाठी एखादा निर्णय घेत येत असावा, असं वाटतं,’ असा टोलाही पवारांनी लगावला होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रीय कार्यकारणीत मला जे पद दिलं तो मी माझा सन्मान समजते, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

News Desk

नैतिकतेच्या मुद्दय़ावर राजीनामा देण्याची जबाबदारी फक्त शिवसेना, राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांवर आहे?

News Desk

सचिन वाझे आणि शिवसेनेतील संबंधांवर संजय राऊत म्हणाले….! 

News Desk