HW News Marathi
देश / विदेश

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात शशी थरुर यांना मोठा दिलासा…..

संपुर्ण राजकारण ढवळून काढणा-या सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात अडकलेले काँग्रेसचे माजी मंत्री शशी थरुर यांच्या केसचा निकाल लागला आहे. या निकालानुसार शशी थरुर यांना न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील विशेष न्यायालयाने तसा निर्णय दिला आहे. त्यामुळे शशी थरूर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली पोलिसांनी शशी थरूर यांच्या विरोधात या प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून घोषित केले होते.

सुनंदा पुष्कर प्रकरणात कोणत्याही पुराव्याअभावी शशी थरूर यांचा सहभाग असल्याचे आरोप करता येणार नाहीत, असं म्हणत न्यायालयाने थरूर यांच्यावरील आरोप रद्द केले आहेत. दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू कोर्टातील विशेष CBI न्यायाधीश गीतांजली गोयल यांनी हा निर्णय दिला आहे. मात्र न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर थरूर यांनी न्यायालयाचे आभार मानले. गेल्या साडेसात वर्षांपासून या प्रकरणात मला यातना आणि वेदना सहन कराव्या लागत होत्या. असेही यावेळी शशी थरुर यांनी म्हटले आहे.

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण नेमकं काय ?fea

17 जानेवारी 2014 रोजी दिल्लीतील एका मोठ्या हॉटेलमध्ये सुनंदा पुष्कर यांचं निधन झालं. मृत्यूपूर्वी काही दिवस आधी पुष्कर यांनी पती शशी थरूर यांचे एका पाकिस्तानी पत्रकाराशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी शशी थरुर यांच्यावर पत्नी सुनंदा पुष्कर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोपी लावण्यात आला होता. या प्रकरणी, 29 सप्टेंबर 2014 रोजी एम्सच्या वैद्यकीय टीमने केलेल्या शवविच्छेदन अहवालात सुनंदा यांचा मृत्यू विषानं झाल्याचं म्हटलं होतं. तसेच, सुनंदा यांच्या पोटात अशी अनेक रसायने आढळली आहेत, जी पोटात गेल्यानंतर किंवा रक्तात मिसळल्यानंतर त्याचं विषात रुपांतर झाल्याचं संबंधित वैद्यकीय टीमनं म्हटलं होतं.दिल्ली पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात शशी थरूर यांना मुख्य आरोपी बनवले होते. दिल्ली कोर्टाने सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात थरूर अद्याप जामिनावर बाहेर होते. दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम 498 ए आणि 306 अंतर्गत आरोपपत्र दाखल केले होते.

सुनंदा पुष्कर कोण होत्या?

सुनंदा पुष्कर यांचं नाव पहिल्यांदा एप्रिल 2010 मध्ये इंडियन प्रीमिअर लीगच्या कोची टीमच्या खरेदी प्रकरणातल्या एका विवादामुळे समोर आलं होतं. सुनंदा यांनी श्रीनगरच्या गर्व्हनमेंट कॉलेज फॉर वुमन मधून पदवी घेतली होती. शशी थरूर यांच्याशी त्यांचं तिसरं लग्न झालं होतं. दुसऱ्या लग्नातून त्यांना एक मुलगा आहे. त्या काश्मीरमधील सोपोरमध्ये राहणाऱ्या होत्या. IPL च्या वादानंतर कोची संघातून सुनंदा पुष्कर यांना त्यांची भागीदारी काढून घ्यावी लागली होती. त्याआधी त्या दुबईच्या एका कंपनीत काम करत होत्या.

पण आता सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण खासदार शशी थरूर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. दिल्लीतील विशेष न्यायालयाने तसा निर्णय दिला आहे. त्यामुळे शशी थरूर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ही वेळ मोदींवर टीका करण्याची नाही – राहुल गांधी

News Desk

राजीव गांधी सामूहिक हत्याकांडाचे जनक, भाजपचे दिल्लीच्या चौकात पोस्टर्स

swarit

महाराष्ट्रातून कांदा निर्यातबंदीचे पडसाद उमटू लागल्यानंतर फडणवीसांचे गोयल यांना पत्र

News Desk