HW News Marathi
महाराष्ट्र

‘१२वीच्या गुणांवरच पदवीचे प्रवेश’, CET परीक्षा होणार नसल्याचं उदय सामंतांचं स्पष्टीकरण!

पुणे। पदवी परीक्षांसाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार नसल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यावेळी ही माहिती दिली आहे. बारावीच्या गुणांवरच पदवीची प्रवेश प्रक्रिया होणार असून उद्यापासून पदवी परीक्षेची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

उदय सामंत यांची माहिती

कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीत बारावीच्या निकालावरच पुढील पदवी परीक्षांसाठी प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला असून उद्यापासून पदवी परीक्षांचे प्रवेश सुरू करण्यात येणार आहेत. कला, विज्ञान आणि वाणिज्य विभागाचे पारंपारिक पद्धतीने अभ्यासक्रम सुरू होतील. आवश्यकतेनुसार, तुकड्यांची वाढ किंवा विद्यार्थी संख्येत वाढ हवी असल्यास ३१ ऑगस्टच्या आधी त्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करावा असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी विद्यापिठाने घ्यावी अशा स्पष्ट सूचना माहिती उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

बारावी परिक्षेसाठी बसणारे विद्यार्थी

यंदाच्या बारावीच्या परीक्षेसाठी एकूण १३ लाख १९ हजार ७५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या विद्यार्थ्यांपैकी मूल्यांकन प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही १३ लाख १९ हजार ७५४ इतकी आहे. मूल्यांकनानंतर बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही १३ लाख १४ हजार ९६५ इतकी आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुम्हीच असे हतबल होऊन आत्मबलिदान दिले तर मला चांगले वाटणार का?

News Desk

ईडीच्या मालकांना आम्ही ५ वर्ष नाही, २५ वर्ष घरी बसवू, संजय राऊतांचा सोमय्यावर हल्लाबोल

News Desk

एखाद्या व्हायरसप्रमाणे आपला राजकीय रंग बदलणे पडळकरांचा गुणधर्म | प्राजक्त तनपुरे

News Desk