HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेसमुळे देशात लोकशाही टिकून राहिली | नाना पाटेकर

पुणे | गेल्या साठ वर्षात देशात लोकशाही टिकली ती काँग्रेस पक्षामुळे. हे वक्तव्य अभिनेता नाना पाटेकर यांनी नाम फाऊंडेशनच्या कार्यक्रमात बोलत असताना केले. याचवेळी त्यांनी शरद पवार यांना पंतप्रधानपदी बघण्याची इच्छा व्यक्त केली.

काँग्रेसने काहीच केलं नाही असं म्हणू नका, इतकी वर्षे देशात लोकशाही टिकली हे श्रेय काँग्रेसचे आहे असं म्हणत नाना पाटेकर यांनी वर्धापन दिनीच भाजपला टोला लगावला. देवेगौडा पंतप्रधान झाले पण शरद पवार झाले नाहीत. ते मुख्यमंत्री, कृषीमंत्री झाले पण पंतप्रधान होता होता राहिले.

एक मराठी माणूस म्हणून पवार पंतप्रधान व्हावेत असं वाटते असंही नानांनी म्हटलंय. सलमान खान ला झालेल्या शिक्षे बाबत कायद्या समोर सर्व समान आहेत एवढीच प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्या शरद पवार इंदू मिलच्या जागेची पाहणी करणार…

swarit

Maratha Reservation | डॉ. हिना गावित यांच्या गाडीची तोडफोड

News Desk

धर्मा पाटलांच्या मुलाने मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

swarit