HW News Marathi
महाराष्ट्र

कोणतीही भाषा नुसती ओठातून येवून उपयोग नाही तर ती पोटातून आली पाहिजे! – अजित पवार

मुंबई | भाषा हे संस्कृतीचे प्रवाही रुप आहे. भाषा प्रवाही असली पाहिजे. त्यासाठी इतर भाषेतल्या शब्दांना सामावून घ्यावे लागेल. ती मानसिकताही तयार करावी लागेल. केवळ एकमेकांशी मराठीत बोलण्याने मराठी भाषेचं संवर्धन होईल. हीसुद्धा एक भाबडी आशा आहे. मात्र हे सर्व करत एक ठोस कृती कार्यक्रम तयार करावा लागेल. केवळ सरकारवर सगळं सोडून चालणार नाही. समाज म्हणून प्रत्येकाने यामध्ये सक्रीय सहभाग दिला पाहिजे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिपादन केले.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोणतीही भाषा नुसती ओठातून येवून उपयोग नाही तर ती पोटातून आली पाहिजे. कोणतीही भाषा टिकायची असेल तर, ती भाषा बोलणाऱ्याचं पोट भरण्याचे सामर्थ्य, त्या भाषेत असणे आवश्यक असते. त्यासाठी ती उद्योगाची, रोजगाराची भाषा असणे आवश्यक आहे. मराठी भाषा ही उद्योगाची व्हावी, यासाठी शासनाबरोबरच आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.

भाषेची उपयोगिता वाढवल्याशिवाय त्या भाषेचे महत्वं, गौरव, सन्मान वाढत नाही. त्यासाठी, मराठी भाषा ही जागतिक संवादाची, संपर्काची, व्यवहाराची, अर्थार्जनाची भाषा कशी होईल, हे बघितले पाहिजे. मराठी भाषेला शक्तिशाली, प्रभावी भाषा बनवायची असेल तर, मराठी ‘ज्ञानभाषा’ झाली पाहिजे. मराठीची उपयोगिता वाढली पाहिजे. आपली भाषा केवळ अभिजात तर असायलाच हवी परंतु ती बहुजात आणि बहुज्ञात व्हायला पाहिजे, असेही पवार म्हणाले.

मराठी भाषेच्या संरक्षण, संवर्धनासाठी, आपण अनेक माध्यमातून प्रयत्न करत आहोत. यावर्षीच्या अर्थसंकल्पात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मुंबईत ‘मराठी भाषा भवन’ उभारण्याचा निर्णय अर्थसंकल्पात जाहीर केला आणि आज त्याचे भूमीपूजन होत आहे, याचा आपल्या सगळ्यांना आनंद आहे. आज भूमीपूजन होत असलेले मराठी भाषा भवन, नियोजित वेळेत पुर्ण होईल. मराठी भाषेच्या बरोबरीने, मराठी अस्मिता, मराठी संस्कृती, मराठी अभिमान, मराठी स्वाभिमान जिवंत ठेवण्यात, वाढवण्यात हे मराठी भाषा भवन येणाऱ्या काळात महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये म्हणून मी निवडणूक लढणार नाही! – संभाजीराजे

Aprna

“महिलांच्या बाबतीत हे सरकार पूर्णपणे असंवेदनशील”, ठाकरे सरकारवर महिला आयोगाकडून टीका

News Desk

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र….!

News Desk