HW News Marathi
महाराष्ट्र

HW Exclusive : मेट्रो, बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प हे राज्याचे असतात, व्यक्तीचे नसतात, राऊतांचा फडणवीसांना टोला

मुंबई | “मेट्रो, बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प हे राज्याचे असताता, व्यक्तीचे नसतात. त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे ते पुढे नेत आहेत,” असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपला लगावला आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने गिरगावात शिवसेनेने आयोजित केलेल्या शोभायात्रेत राऊतांनी हजेरी लावली. 

 राऊत म्हणाले, “श्रेय वाद करण्याचा प्रश्नच येत नाही. गेल्या अडीज वर्षापासून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. या अडीज वर्षामध्ये मेट्रोचे काम ज्या गतीने त्यांनी पुढे नेहले आहे. आणि मेट्रो, बुलेट ट्रेन इतर काही प्रकल्प असतील हे राज्याचे असताता. व्यक्तीचे नसतात. आणि त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे ते पुढे नेत आहेत,” असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ चे उद्घाटन श्रेयावर एच. डब्ल्यू. मराठीच्या प्रतिनीधींनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले.

दोन वर्षानंतर गुढीपाडव्याच्या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले, यावर राऊत म्हणाले, “काल मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांनी निर्बंध उठवलेत. आणि हे गिरगाव आहे… गिरगाव हा मराठी माणसाचा आणि शिवसेनेचा गेल्या ५५ वर्षाचा बाल्लेकिल्ला आहे. याच गिरगावमध्ये बाजुला मुख्यमंत्री मराठी भवनाचा उद्घाटन करत आहेत. यातून तुम्ही गिरगावाचे महत्व समजून घ्या. आज गुढीपाडव्या निमित्ताने भगवे झेंडे आणि ही सर्व शोभायात्रा पुढे पुढे जात आहेत. ही मराठीची आणि आपल्या मराठी माणसाची ओळख आहे. ही शिवसेनेने खास करून बाळासाहेब ठाकरेंनी इतक्या वर्षे आपल्याला हा ठेवा दिलेला आहे. आज ही तरुणपिढी पुढे घेऊन चालली आहे. हे पहायाल आलोय. आनंद आहे.” 

महाराष्ट्र हा तणावमुक्त आणि निर्बंधमुक्त असावा, ही भूमिका मुख्यमंत्र्यांची – राऊत 

तब्बल दोन वर्षानंतर हा उत्साह आपण पाहात आहे आणि राज्यातील इतर सणासोबत सुद्धा इतका उत्साह असेल का?, यावर राऊत म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये ठाकरे सरकारच्या नेतृत्वाखाली लोकांनी आनंदाने जगावे. उत्साहत जगावे. अशी एक भूमिका आहे. कोणताही तणाव घेऊ नका, जो काही तणाव असेल तो आम्ही दिल्लीमध्ये बघू, महाराष्ट्र हा तणावमुक्त आणि निर्बंधमुक्त असावा, ही भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे.”  जे राजकारण करत आहेत, त्यांना ते लखलाभ त्यांचे राजकारण लखलाभ ठरो, राजकारण किती जरी केले. तरी आज तुम्ही रस्त्यावर पहाता, या जनतेचा त्या राजकारणाशी त्यांचा काही संबंध नाही. ते आपले उतरलेत छानपैकी आणि आनंद घेत आहेत, सणांवरून जे राजकारण केले जात आहे, तुम्ही राजकीय नेत्यांना काय सांगा, हा प्रश्न एच. डब्ल्यू. मराठीच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पोहरादेवीची ‘पूजा’ तरी कशी पावेल, जर चव्हाणांच्या पूजाचं काय झाल ते सांगितलं नाहीत तर?” भाजपचा सवाल  

News Desk

घरभाडे वसुली तीन महिने पुढे ढकलावी घर भाडे न दिल्याने भाडेकरूंना निष्कासित करू नये, राज्य सरकारच्या सूचना

News Desk

खासदार उदयनराजे यांना अटक

News Desk