HW News Marathi
देश / विदेश

फडणवीस निव्वळ जनतेची दिशाभूल करण्याचं काम करत आहेत | नवाब मालिकांचा आरोप

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण करण्यासाठी पुढे आले. दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांनी अनिल देशमुखांवर माजी मुंबई पोलीस आयुक्तांनी केलेले आरोप आरोप तथ्यहीन असल्याचे म्हटले. त्याचप्रमाणे, आपल्याकडे त्याबाबतची कागदपत्रेही असल्याचे पवार म्हणाले. त्यानंतर, विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. याच पार्श्वभूमीवर, आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी फडणवीसांना प्रत्यत्तर दिले आहे. नवाब मलिक म्हणाले कि, “फडणवीस यांनी दिलेली माहिती चुकीची आहे. फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हालचालीबाबत भ्रम निर्माण करणारी माहिती दिली.”

देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांना प्रत्यत्तर देताना नवाब मलिक म्हणाले कि, देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्या हालचालीबाबत भ्रम निर्माण करणारी माहिती दिली. त्याचप्रमाणे, कोणताही मंत्री अथवा मुख्यमंत्री पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली करु शकत नाही. फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री होते. फडणवीसांना चांगलेच माहिती असेल कुठलाही मंत्री अथवा गृहमंत्री अधिकाऱ्यांच्या थेट बदल्या करु शकत नाही. बदल्यांसाठी पोलीस एस्टाब्लिशमेंट बोर्ड कमिटी असते”, असे म्हणत संपूर्ण प्रक्रिया सांगत नवाब मलिक यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.

पोलीसांच्या दैनंदिन कार्यक्रमाची माहिती देऊन फडणवीसांकडून लोकांची दिशाभूल !

“IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी ही कमिटी प्रस्ताव तयार करते. या बोर्डमधील सदस्यांच्या शिफारशीनंतर हा प्रस्ताव गृहमंत्र्यांच्या कार्यालयात येतो. तिथे हे अधिकारी आपले मत नोंदवतात. त्यापुढे मुख्यमंत्री कार्यालयात मान्येतसाठी हा प्रस्ताव पाठवल्यानंतर बदल्यांच्या ऑर्डर्स निघतात. त्यामुळे कोणताही मंत्री अथवा मुख्यमंत्री अधिकाऱ्यांची थेट बदली करु शकत नाहीत”, असे नवाब मलिक म्हणाले. त्याचप्रमाणे, अनिल देशमुखांनी ५ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत कुठल्याही सार्वजिनिक कार्यक्रमात सहभाग घेतला नाही. पोलीसांच्या दैनंदिन कार्यक्रमाची माहिती देऊन फडणवीस यांनी लोकांची दिशाभूल केल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात पहिल्यांदच केली जाणार ‘श्रमगणना’

News Desk

“कपिल देवपेक्षा इम्रान खान खूप भारी क्रिकेटर होता”-माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाक

News Desk

“… तोपर्यंत मी विधानसभेत पाऊल ठेवणार नाही!”, चंद्राबाबू नायडूंनी घेतली शपथ

News Desk