HW News Marathi
महाराष्ट्र

“महाविकासआघाडी सरकारच्या संवेदना बधीर झाल्या”, फडणवीसांची शिक्षकांच्या आंदोलनावरुन सरकारवर टीका

मुंबई | “शाळा अनुदानासह इतरही मागण्यांसाठी गेल्या ४० दिवसांपासून शिक्षक संघटना मुंबईत आंदोलनाला बसल्या आहेत. पण, महाविकासआघाडी सरकारच्या संवेदना बधीर झाल्या आहेत. पूर्वी आंदोलनं झाली तर मंत्री, अधिकारी भेटायला यायचे. आज तर कुणीही भेटायला येत नाही.” असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासघाडी सरकारवर आज टीका केली आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानसपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप नेते गिरीश महाजन, रणजित पाटील यांनी आज आझाद मैदानात सुरू असलेल्या विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

“मुळात जो निर्णय आमच्या सरकारच्या काळात झाला आणि त्यासाठीची आर्थिक तरतूद सुद्धा झाली, ती केवळ हे सरकार अंमलात आणत नाही, म्हणून शिक्षकांसारख्या घटकावर आंदोलनाची वेळ येणे आणि त्यांना इतके दिवस बसवून ठेवणे हे दुर्दैवी आहे. नुसत्या अंमलबजावणीला सव्वा वर्ष लागतो? मुंबईच्या बिल्डरांना ५ हजार कोटी रूपयांची सूट आणि शिक्षकांसाठी ३०० कोटी खर्च करायला तयार नाही, हे खेदजनक आहे”, असे फडणवीस म्हणाले आहेत.

तसेच, विनाअनुदानित शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न आम्ही आजच्या बैठकीत मांडणार आहोत, जर हा प्रश्न सोडवला नाही तर अधिवेशन चालू देणार नाही. असा इशारा देखील यावेळी फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला. शिक्षकांच्या या आंदोलनास भाजपचा १०० टक्के पाठिंबा असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तरुणांना संमोहित करून कट्टरवादी बनविण्याचा सनातनचा कट – सीबीआय

Gauri Tilekar

उद्योगपतीच्या मुलाच्या मारेकऱ्याची जेलमध्ये हत्या

News Desk

अन्नदात्याच्या मदतीला आई आली धावून

News Desk