HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होणार !

 मुंबई | देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपच्या नेते पदी देवेंद्र फडणवीस निवड करण्यात आली. “अफवांवर विश्वास ठेवू नका, पुढील पाच वर्षी महायुतीचेच सरकार स्थापन होणार, ” असा दावा फडणवीस यांनी नवनिर्वाचित आमदारांशी सोबांधित करताना म्हणाले. या बैठकीत पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून यावेळी नेता निवडीसाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता. निवडणुकीत्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, दिल्ली नरेंद्र तर राज्यात देवेंद्रचे सरकार आणुया, यावर पुन्हा एकदा निश्चित झाले आहे.

फडणवीस यांनी पुढे म्हणाले की,  पंतप्रधा नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मित्र पक्ष शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे देखील आभार मानले. भाजपने आज (३० ऑक्टोबर) विधीमंडळ नेते पदी निवड करण्यासाठी बैठकीचे आयोजिक केले होते. दरम्यान फडणवीस म्हटले की, गेल्या पाच वर्षात आम्ही संगळ्यांसाठी काम केली. पुढील ५ वर्षात दुष्काळमुक्त महाराष्ट्र करायचा असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांने राज्य करू, असे वचन फडणवीस यांनी विधीमंडळ नेते पदी नियुक्ती झाल्यानंतर नवनिर्वाचित आमदारांना संबोधित करताना म्हणाले.

भाजपचे प्रदेध्याक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने विधीमंडळात प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित आमदार शिवेंद्रराजे भोसले, अर्थमंत्री सुधीर मुनंगटीवार यांच्यासह १० आमदारांनी अनुमोदन दिले. त्यांचे ऊर्वरित आमदारांना समर्थनाथ केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आम्ही सरकारमुळे नाही…”, नाना पटोलेंच्या वक्तव्याची जयंत पाटलांकडून पाठराखण

News Desk

“अमरावती हिंसाचार षडयंत्राचा भाग होता का ?,” मलिकांचा भाजपवर आरोप

News Desk

महागाईची झळ टपरीवरच्या चहाला; राज्यातील चहा 2 रुपयाने महागला

Aprna