HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेस सावरकरविरोधी नाही !

मुंबई | स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी पाठपुरावा करणार, असे आश्वासन भाजपने त्यांच्या संकल्प पत्रात केले आहे. भाजपच्या या घोषणेनंतर राजकीय वातावरण चांगले तापले आहे. यानंतर काँग्रेसने यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती, मात्र, माजी पंतप्रधान व काँग्रेस नेते डॉ. मनमोहन सिंग यांनी काँग्रेस सरकारविरोधी नसल्याचे सांगत काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. सिंग यांनी आज (१७ ऑक्टोबर) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

मनमोहन सिंग म्हटले की, “काँग्रेस ही सावरकरविरोधी नाही. वीर सावरकर यांच्याबाबत आम्हाला आदरच आहे. मात्र त्यांच्या विचारांबाबत मतभेद आहेत,” असे म्हणाले. “स्वत: इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतिप्रित्यर्थ काढण्यात आलेल्या टपाल तिकीटाचे अनावरण केले होते.” असे मनमोहन सिंह यांनी सांगितले. तसेच भारतरत्न कुणाला द्यावे हे एक समिती ठरवते,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरही मनमोहन यांनी भाष्य केल. कलम ३७० हटवण्यास आमचा विरोध नाही मात्र या निर्णयाची ज्याप्रकारे अंमलबजावणी करण्यात आली आहे, त्यास आमचा आक्षेप आहे, असे मनमोहन म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१० वी १२ वीचे प्रत्यक्ष वर्ग प्रायोगिक तत्वावर सुरू होणार

News Desk

राजू शेट्टी यांनी घेतली नारायण राणे यांची भेट, मोर्चेबांधणीला सुरुवात

News Desk

“स्वत:चा राजकीय अजेंडा महत्त्वाचा मानू नका” दिलीप-वळसे पाटलांचा मनसेला टोला

News Desk