HW News Marathi
महाराष्ट्र

केवळ शेतकऱ्यांचे आंदोलन चाललंच पाहिजे, या हेतूने काही लोकं ते चालवण्याचा प्रयत्न करत – देवेंद्र फडणवीस 

मुंबई | कृषी कायद्यांच्या विरोधात राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचे केंद्र सरकार विरोधात आंदोलन सुरु आहे. यावरुन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. “सुरुवातीच्या काळात या आंदोलनात शेतकरी मोठ्याप्रमाणावर होते, परंतु आता शेतकरी देखील मोठ्याप्रमाणात निघून गेले आहेत. कारण शेतकऱ्यांच्या देखील हे लक्षात आलं आहे की , केंद्र सरकार सर्व मागण्या मान्य करत असताना, केवळ हे आंदोलन चाललंच पाहिजे, या हेतूने काही लोकं ते चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.”

केंद्र सरकराच्या नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास, महिनभरापेक्षाही अधिक दिवस झाले आहेत. मात्र, अद्यापही यावर तोडगा निघालेला नसल्याने हे आंदोनल सुरूच आहे. शेतकरी संघटना आपल्या भूमिकांवर ठाम असल्याने, केंद्र सरकार व शेतकऱ्यांमधील चर्चांच्या बैठका निष्फळ ठरत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. त्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने केंद्र सरकारची कानउघडणी केली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.

“मला असं वाटतं आहे की आता जर आपण दिल्लीचं आंदोलन बघितलं. तर, डाव्या विचारसरणीचे लोकचं त्याचं नेतृत्व करत असल्याचं दिसत आहेत व अन्य काही वेगळी लोकं देखील आहेत. सुरुवातीच्या काळात शेतकरी मोठ्याप्रमाणावर होते, परंतु आता शेतकरी देखील मोठ्याप्रमाणात निघून गेले आहेत. कारण शेतकऱ्यांच्या देखील हे लक्षात आलं आहे की , केंद्र सरकार सर्व मागण्या मान्य करत असताना, केवळ हे आंदोलन चाललंच पाहिजे, या हेतूने काही लोकं ते चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतू मला विश्वास आहे, केंद्र सरकार संपूर्ण चर्चा करत आहे. संवादातून प्रश्न सुटतात, त्यामुळे ते सुटतील. जे काही नेते आता बैठका करत आहेत किंवा याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झालाच, तरी फार तो यशस्वी होईल असं मला वाटत नाही.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्तीबाबत सचिवस्तरावर समिती स्थापन करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

News Desk

शिवसेना-भाजपची खरंच युती होणार का? संजय राऊतांनी दिलं ‘हे’ उत्तर!

News Desk

राज्यात १ लाख ९७ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप, तर ७ हजार ८३० क्विंटल अन्नधान्याचे वाटप

News Desk