HW News Marathi
महाराष्ट्र

इगोपोटी राज्य सरकारने मेट्रो कारशेडचा निर्णय घेतला -फडणवीस

मुंबई | कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचं काम तत्काळ थांबवण्याचे निर्देश एमएमआरडीएला देण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या वतीनं हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे मेट्रो कारशेडचा प्रकल्प बारगळणार आहे. तसेच तूर्तास भूखंडाची स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे निर्देशही हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्यात यावर अंतिम सुनावणी घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. यावरुन आता विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून सरकारला कोंडीत पकडण्याचे काम सुरु झाले आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

मेट्रोच्या कारशेडला न्यायालयाने मान्यता दिली पण राज्य सरकारने केवळ इगो करता ऑर्डर काढून कांजूरला नेण्याचा प्रयत्न केल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. आजचा उच्च न्यायालयाचा निर्णय हा राज्य सरकारला चपराक असल्याचे ते म्हणाले.कांजूरमार्ग येथे कारशेड नेलं तर चार वर्ष उशीर होईल आणि ५००० कोटींचं नुकसान होईल हे आधी सांगितलं होतं पण सरकारने ऐकण्याची भूमिका ठेवली नाही. आता इगो बाजुला ठेवा आणि आरे मध्ये कारशेडचे काम सुरु करा. आम्ही कोणताही विरोध करणार नाही असेही फडणवीस म्हणाले आहेत.

या जमिनीमुळे सरकारचे ५ हजार ५०० कोटी रुपये वाचणार आहेत. मेट्रो लाईन ६, ४ आणि १४ साठी ही कारशेड महत्वाची असल्याचे ट्वीट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलंय. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंच्या प्रतिक्रियेवर देखील भाष्य केले. आदित्य ठाकरे हे तरुण नेते आहेत. पण त्यांनी थोडा अहवालाचा अभ्यास करावा नंतरच विधान करावं असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.

“विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारची हार जीत करू नये. मुंबईच्या विकासासाठी काम हे केलं पाहिजे. मेट्रोच्या कामासाठी लाणारा पैसा हा जनतेचा, सर्वांचाच आहे. कारशेडचं काम त्वरित सुरू न केल्यास प्रकल्प २०२४ पर्यंत लांबेल. राज्य सरकारचा त्याच जागेसाठी अटट्हास का आहे?,” असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

“मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचं काम केलं जात आहे. सरकार या कामात जेवढा उशीर करेल तितकी त्या प्रकल्पाची किंमत वाढत जाणार आहे. उशीर झाला तर दिवसाला सर्व मिळून पाच कोटी रूपयांचं नुकसान होतं. गेलं वर्षभर हे काम रखडलं आहे. त्यामुळे आतापर्यंत किती नुकसान झालंय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आरेमध्ये तात्काळ कारशेडचं काम सुरू करण्यात यावं,” असंही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली. “आदित्य ठाकरे हे नवे आहेत. युवा आहेत. ते पहिल्यांदाच मंत्रिपदावर आहेत. त्यांनी जनतेसाठी काम करावं. त्यांनी अहवाल वाचून काम करावं. यापूर्वी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल त्यांनी वाचावा”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जिल्हाधिकारी डोंगरे यांनी नायगाव व बिलोली तालुक्यातील जलयुक्त शिवार अभियांतर्गत विविध कामांची पहाणी केली

News Desk

बाळासाहेब ठाकरेंचे ‘हे’ स्वप्न उद्धव ठाकरे पूर्ण करणार; औरंगाबादच्या सभेत दिले संकेत

Aprna

जलवाहतूक व्यवस्थापनात नेदरलँड्सचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna