HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवारांना फक्त स्वतःच्या मुलाची चिंता! स्वप्नील लोणकर आत्महत्येवरून गोपीचंद पडळकरांचा घणाघात

दौंड। पुण्यातील एमपीएससी विद्यार्थी स्वप्नील लोणकर याने गेल्या काही दिवसांपूर्वी नैराश्यातून आत्महत्या केली त्यानंतर मात्र, या प्रकरणावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. अजित पवार यांना स्वप्निलशी काही घेणेदेणे नाही, त्यांना त्यांचा मुलग पार्थची काळजी आहे. पार्थला आमदारकी, खासदारकी किंवा एखादा कारखाना मिळतो का याची चिंता अजित पवार यांना असल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे.

पडळकरांनी लोणकर कुटुंबीयांची घेतली भेट-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या तरुणाने पुण्यात आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूनंतर एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सरकारी नोकरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्वप्नीलचे सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न अर्धवट राहिले. स्वप्निलच्या मृत्यूमुळे लोणकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दौंड तालुक्यातील केडगाव येथे स्वप्निलच्या घरी जाऊन त्याच्या आई वडिलांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत दौंडचे आमदार राहुल कुल हेदेखील उपस्थित होते.

लोणकर कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही अजित पवार यांनी अद्याप लोणकर कुटुंबियांची भेट घेतलेली नाही. अजित पवार यांना स्वप्निल लोणकरशी काही देणेघेणे नाही. त्यांना फक्त स्वतःच्या मुलाचे म्हणजेच पार्थ पवारचे पडले आहे. पार्थला आमदारकी, खासदारकी किंवा एखादा कारखाना मिळतो का, याची चिंता अजित पवार यांना आहे, असा घणाघाती टोला पडळकर यांनी यावेळी लगावला.

सरकारची अनास्थाच कारणीभूत असल्याचा आरोप-

स्वप्नील लोणकरच्या मृत्यूला सरकारची अनास्थाच कारणीभूत असल्याचा आरोप पडळकरांनी केला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी स्वप्नीलच्या घरच्यांना पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत द्या, अशी मागणी विधानसभा अधिवेशनावेळी सभागृहात केली होती. अधिवेशन होऊन गेले, मात्र अजून सरकारकडून स्वप्निलच्या घरच्यांना ठोस मदत मिळालेली नाही. सरकार नुसत्या बैठका घेणार असेल तर मी या सरकारचा निषेध करतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारचा प्रतिनिधी पाठवून लोणकर कुटुंबियांची भेट घेणे गरजेचे होते. मात्र अद्याप तसे घडलेले नाही, अशा शब्दांत पडळकरांनी मुख्यमंत्र्यांनाही टोला लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागरी पाणी पुरवठा योजनांसाठीच्या थकीत कर्जाची एकरकमी परतफेड

News Desk

“दरेकरांचं जाकिट बघून कोरोना म्हटला असेल जाकीटातून कुठे आत शिरु” -अजित पवार

News Desk

नाटकांच्या माध्यमातून मिळते आनंदाची अनुभूती! – सुधीर मुनगंटीवार

Aprna