HW News Marathi
देश / विदेश

फोन टॅपिंगप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने देवेंद्र फडणवीस घाबरलेत !

मुंबई | राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी जो अहवाल दिला तो नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड यांनी तयार केला आणि त्यावर सिताराम कुंटे यांनी सही केली असा आरोप फडणवीस करत आहेत हे योग्य नाही परंतु आता गुन्हा दाखल झाल्याने जवळचे व्यक्ती अडचणीत येतील म्हणून देवेंद्र फडणवीस घाबरले असल्याने ते आरोप करत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज (२७ मार्च) लगावला आहे.

रश्मी शुक्लांचा अहवाल नवाब मलिक यांनी सार्वजनिक केला असे देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. रश्मी शुक्लाच्या पत्राचा आधार घेऊन दिल्लीत प्रेस घेऊन सरकारवर आरोप करत होते. मुंबईतही प्रेस घेतली व बदल्यांमध्ये पैसे खाल्ले असे सांगत होते. केंद्रीय गृहसचिवांना व राज्यपालांनाही भेटले. मुंबईत प्रेस घेतली त्यावेळी खुलासा करताना या रश्मी शुक्लाचा रिपोर्ट काय आहे. बेकायदेशीर फोन टॅप केले. रश्मी शुक्लाचा रिपोर्ट येईपर्यंत कुठल्याही अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या नव्हत्या. नंतरच्या काळात काही बदल्या झाल्या ते सांगत आहेत. १२ नावे त्यात आहेत. महाराष्ट्र पोलिसमध्ये बदल्या होत राहतात.पोलीस बोर्डच्या अध्यक्षतेखाली होतात. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचं काम केल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

“गुन्हा दाखल झाल्यावर फडणवीस का घाबरत आहेत?”

“नवाब मलिक यांनी अहवाल फोडला असे फडणवीस बोलत आहेत. परंतु गुन्हा दाखल झाल्यावर ते का घाबरत आहेत”, असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे. चोरी झाली नाही अशी बोंबाबोंब फडणवीस करत आहेत. अफवा पसरवून लोकांना बदनाम करत आहेत. सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न करत नाही आमचे सरकार खंबीरपणे उभे आहे असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकसभेचे वेळापत्रक आज सायंकाळी जाहीर होणार  

News Desk

‘बरे झाले, सर्वोच्च न्यायालयाने कान टोचले’, फारुख अब्दुल्लांच्या प्रकरणावरुन सामनातून टीका

News Desk

राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर मांडला

News Desk