HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीसांनी भर पत्रकार परिषदेत लावला उपमुख्यमंत्र्यांचा तो व्हिडिओ

उस्मानाबाद | राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. याचीच पाहणी करण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेगवेगल्या ठिकाणी दौरे करत आहेत. आज दौऱ्या दरम्यान, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे.

राज्य सरकारने तात्काळ पंचनामे संपवले पाहिजेत, पंचनामे होणार नाही तिथे मोबाइलने फोटो पाठवल्यास मदत दिली जाईल अशी भूमिका घेतली पाहिजे अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दीर्घकालीन मदतीसाठी वेळ लागेल, पण तात्काळ मदत केली पाहिजे असंही ते म्हणाले आहेत. “मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात काही जणांना चार हजार, पाच हजार अशी मदत देण्यात आली. अशा प्रकारची मदत करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करु नये,” असं यावेळी त्यांनी सांगितलं आहे.

फडणवीसांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत नसताना प्रती हेक्टर २५ हजारांची मदत करण्याची मागणी केली होती यासंबंधीचा व्हिडीओ दाखवला. मुख्यमंत्र्यांकडे आपली मागणी पूर्ण करण्याची ही चांगली संधी आहे असा टोला यावेळी त्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यांनंतर काही दिलासा मिळालेला दिसत नाही अशी टीका करताना इच्छाशक्ती असेल तर मदत करता येते, घोषणा करुन समाधान होणार नाही असं ते म्हणाले आहेत.

‘जे सत्तेत असतात त्यांनी संयम दाखवायचा असतो. पण तेच इतकं राजकीय बोलत आहेत. हे योग्य नाही. मला राजकारणात रस नाही. तुम्ही राजकीय बोललात तर मी राजकीय बोलेन. संवेदनशीलता दाखवत शेतकऱ्यांना काय दिलासा देता येईल अशा वक्तव्याची अपेक्षा आपण राज्य सरकारकडून करत आहोत,” असं यावेळी फडणवीसांनी म्हटलं. “शरद पवारांना सगळं माहिती असताना जाणुनबुजून केंद्राकडे टोलवत आहेत. पंतप्रधान संवेदनशील आहेत ते मदत करतील. युपीएपेक्षा जास्त मदत सरकार करेल,” असंही फडणवीस म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून औरंगजेबाची कबर ५ दिवस बंद ठेणार! – अजित पवार

Aprna

राज्य सरकारची भोंग्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक, राज ठाकरेंची अनुपस्थिती

Aprna

“खासगी कामासाठी सरकारी विमानाने प्रवास का केला?”, हायकोर्टाचा राऊतांना सवाल

News Desk