HW News Marathi
महाराष्ट्र

Jayant Patil HW Exclusive : …म्हणून शरद पवार अस्वस्थ आहेत !

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांशी फोनवरून परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले आहे. यावर सांगता जयंत पाटील म्हणाले की,शरद पवार यांना घरात बसवत नाही, ते घरात अस्वस्थ होतात, असे त्यांनी एच. डब्ल्यू. मराठीला दिलेल्या मुलाखती खास करून सांगितले.

राज्याती कोरोनाचे संकट ओढवले असून याप्रसंगी शरद पवार यांचे पक्षातील नेत्यांना आणि सरकारला केसे मार्गदर्शन करत आहे?, याप्रश्नावर उत्तर देताना जयंत पाटील पुढे म्हणाले, लोकांशी चर्चा करून ज्याकाही गोष्टी शरद पवारांना सुचतात. ते त्या सर्व सुचना आम्हाला आणि राज्य सरकारला सुचवितात, असे त्यांनी सांगितले. तसेच शरद पवार यांना घराब बसवत नाही, ते घरात अस्वस्थ होतात, असे त्यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले.

मुंबईची लाईफलाईन लोकल कधी चालू करण्यात येईल याबद्दल जयंत पाटी म्हणाले की, लोकल ट्रेनमध्ये गर्दी ही होतेच. यातून कोरोनाचा सामूहिक संसर्ग होण्याची दाट शक्या आहे. त्यामुळे नाईलाजाने मुंबईची लोकल ट्रेन बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेतल्याचे त्यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारला राज्याला मदत ही करावी लागेल

राज्य सरकारला केंद्रकडून आर्थिक मदतीची काही अपेक्षा आहे का?, या प्रश्न विचारण्यात ते म्हणाले की, केंद्र सरकारने जागतिक बँकेकडून १.२ मिलियन डॉलरचे कर्ज घेतले आहे. एशियन डेवलपमेंट बँकेकडून २.२ मिलियन डॉलरचे कर्ज घेतले की मदत याबद्दल माहिती नाही, परंतु या पैशाचा वापर कोरोनाग्रस्तांची मदत करणे हे अपेक्षित आहे, असे मत जयंत पाटील यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना व्यक्त केले आहे. आणि महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांना राज्याला मदत ही करावी लागेल, असेही ते एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना म्हणाले.

मास्क आणि पीपीई कीटची कमतरता

कोरोना रुग्णांवर इलाज करताना डॉक्टरांना विशेष सुरक्षाकवच परिधान करावाला लागतो. मात्र, केंद्राने राज्यांना पाठविले असून पत्रानुसारपीपीई कीट आणि एन-९५ मास्क केंद्र सरकार विकत घेऊन राज्य सरकारना परविणार असल्याचे नमुद केले आहे. यामुळे केंद्रकडून पीपीई कीट आणि एन-९५ मास्क येत आहे. मात्र, या पीपीई कीट आणि एन-९५ मास्कची राज्यात कमतरता भसत असल्याचेही जयंत पाटील यांनी एच. डब्लू. मराठीशी बोलताना सांगितले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी!

News Desk

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात राजीनामा देणार?

News Desk

“तालिबानींपेक्षा ही भयंकर तालिबानी हे लोकं ”, आशिष शेलारांचं विधान

News Desk