HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरेंची नाणार प्रकल्पाची भूमिका योग्यच – देवेंद्र फडणवीस

मुंबई | शिवसेनेच्या काही नेत्यांना मोकळेपणाने बोलायची संधी दिली तर ते देखील नाणार प्रकल्पाला पाठिंबा देतील, असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. नाणार प्रकल्पाचा निवडणुकीशी कोणताही संबंध नाही. राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाबाबत घेतलेली भूमिका योग्य असून आम्ही त्याचे स्वागत करतो, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

फडणवीस आज (८ मार्च) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी रत्नागिरीच्या नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाचे पूर्णपणे समर्थन केले. मला राज ठाकरे यांचे पत्र मिळाले आहे. त्यांची भूमिका अगदी योग्य आहे. अनिल काकोडकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर सर्व शंका संपल्या आहेत. ते या प्रकल्पाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यासाठी मदत करणार आहेत. ही ग्रीन रिफायनरी आहे, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

गुजरातमध्ये प्रकल्पामुळे उत्पन्न वाढले – देवेंद्र फडणवीस

ज्या भागात अशाप्रकारचे तेलशुद्धीकरण प्रकल्प असतात तेथील उत्पन्न वाढते. गुजरातमध्ये ही बाब सिद्ध झाली आहे. आर्थिक उलाढाल वाढल्याशिवाय रोजगार वाढवणे शक्य नाही. नाणार रिफायनरी ही राज्यातील सर्वात मोठी गुंतवणूक असणार आहे. याचा निवडणुकीशी कोणताही संबंध नाही. लोकांचा पाठिंबा असेल तर आम्ही या प्रकल्पासाठी तयार आहोत, असे शिवसेना म्हणते. मुळात लोक मोठ्याप्रमाणावर या प्रकल्पासाठी जमिनी देण्यासाठी तयार आहेत. शिवसेनेच्या अनेक नेत्यांना मोकळेपणाने बोलायची संधी दिल्यास ते या प्रकल्पाचे समर्थनच करतील, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पुढाकारामुळे आता रत्नागिरीच्या नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कालच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाणार प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊन देऊ नका, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे राज्य सरकारने गुंडाळलेल्या नाणार प्रकल्पाची फाईल पुन्हा उघडणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आज नाणारमधील काही प्रकल्पग्रस्त राज ठाकरे यांची भेट घेतली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

घरगुती ग्राहक आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोपर्यंत तोडणार नाही, अजित पवारांची मोठी घोषणा

News Desk

कोरेगाव भीमा प्रकरणातील मुख्य आरोपी वरवरा राव यांना अखेर जामीन मंजूर

News Desk

‘आघाडी सरकार साहेबांच्या मार्गदर्शनानं आलंय, आपल्याला संपूर्ण मदत होईल’

News Desk