HW News Marathi
महाराष्ट्र

आम्हाला काय खुर्च्या उबवण्यासाठी सरकारमध्ये यायचं नाही!

मुंबई | विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस कायमच महाविकासआघाडी सरकारवर टीका करत असतात. ‘लोकसत्ता’कडून आयोजित ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूर-संवादमालिकेत ते बोलत असताना त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीकास्त्र उगारले आहे. आम्ही राजकारणात भजन स्पर्धेसाठी आमचा पक्ष चालवत नाही असं राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आमचा एक विकासाचा अजेंडा असून तो तो अजेंडा राबवायचा असेल तर सरकारमध्ये यावं लागेल असं त्यांनी सांगितलं आहे.

“आम्ही राजकारणात भजन स्पर्धेसाठी आमचा पक्ष चालवत नाही”

सरकार पडणं हा तुमच्या प्रतिक्षेचा भाग असायला हवा का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “आम्ही राजकारणात भजन स्पर्धेसाठी आमचा पक्ष चालवत नाही. केवळं भजनं म्हणण्यासाठी आम्ही येथे आलेलो नाही. आमचा एक विकासाचा अजेंडा आहे. तो अजेंडा राबवायचा असेल तर सरकारमध्ये यावं लागेलं. आम्हाला काय खुर्च्या उबवण्यासाठी सरकारमध्ये यायचं नाही”.

गुंतवणुकीत आम्ही गुजरातला इतकं मागे टाकलं की…

पुढे ते असंही म्हणाले की, “मी पाच वर्ष मुख्यमंत्री होतो तेव्हा पहिलं वर्ष वगळत चारही वर्ष आम्ही गुजरातच्या पुढे गेलो. गुंतवणुकीत आम्ही गुजरातला इतकं मागे टाकलं की गुजरातसहित तीन प्रमुख राज्यांची जितकी गुंतवणूक व्हायची त्यापेक्षा जास्त आम्ही महाराष्ट्रात आणत होते. आता जे सरकार आलं आहे या सरकारमध्ये गुजरात १० टक्के पुढे गेलं पण कोणी काहीच बोलत नाही. आमच्या काळात किती आंकांडतांडव करायचे सर्वजण. पण आता कोणी त्याच्यावर प्रश्न विचारण्यास तयार नाही”.

मीडियाबद्दल रोख नाही पण…

“सत्ता पक्षात असो किंवा विरोधी पक्षात आमचा अजेंडा ठरलेला आहे. आमच्या अजेंड्यावर आम्ही करत आहोत. आमच्या अजेंड्यावर काम करताना सरकार पडणं आमचं बायप्रॉडक्ट आहे, मेन प्रॉडक्ट नाही,” असंही यावेळी ते म्हणाले. फडणवीसांनी यावेळी मीडियावरही निशाणा साधला. “मीडियाबद्दल रोख नाही पण हे सरकार चाललं पाहिजे अशी जबाबदारी घेतल्याचं दिसत आहे. त्यामुळे जेवढी छाननी आमची व्हायची त्याच्या पाच पटही यांची होत नाही,” असं ते म्हणाले.

गुजरातच्या पुढे महाराष्ट्राला नेलं पुन्हा मुख्यमंत्री व्हावं यासाठी दिल्लीने प्रयत्न केले असं तर नाही ना? असा मिश्किल प्रश्न विचारल्यानंतर फडणवीसांनी, “गुजराच्या पुढे महाराष्ट्राला नेल्याने येथील तीन पक्षांना हा पुन्हा मुख्यमंत्री झाला तर आपल्याकडे मुद्दा उरणार नाही असं वाटलं म्हणून एकत्र आले,” असा टोला ठाकरे सरकारला लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुम्ही शेतकऱ्यांचे जाणते राजे नव्हता तर तुम्ही शेतकऱ्यांचे विश्वासघाती राजे होता – सदाभाऊ खोत 

News Desk

मराठी भाषेची चीड येते असे बोलणाऱ्या जान कुमार सानूवर मनसेचा हल्लाबोल!

News Desk

राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे विचार सदैव मार्गदर्शक, त्याच विचारांवर राज्याची वाटचाल | अजित पवार

News Desk