HW News Marathi
Covid-19

“मी मोदींना नेहमीच पत्रं लिहित असतो, पण कांगावाखोरांना उत्तर देत नाही”, फडणवीसांचे पटोलेंना प्रत्युत्तर

अकोला | देशाला स्मशानभूमी करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस देवेंद्र फडणवीसांनी करावे, असं आव्हान काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. पटोले यांची ही टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना चांगलीच लागलेली दिसत आहे. फडणवीसांनी या टीकेची दखल घेत पहिल्यांदाच पटोलेंना प्रत्युत्तर दिलं आहे. मी मोदींना नेहमीच पत्रं लिहित असतो, पण कांगावाखोरांना उत्तर देत नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस आज (१६ मे) अकोल्यात होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. मी मोदींना नेहमीच पत्रं लिहीत असतो. महाराष्ट्राला आवश्यक ती मदत मोदींकडून मागत असतो आणि मोदींकडून ती मदत मिळतेही. महाराष्ट्राला सर्वाधिक व्हेंटिलेटर मोदींनी दिले. महाराष्ट्राला सर्वाधिक रेमडेसिवीर मोदींनी दिले. पण काहींना कांगावा करण्याची सवय आहे. अशा कांगावाखोरांना मी उत्तरे देत नाही, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

अमरावतीत तिसरी लाट येणार की नाही, असं काही अधिकृत सांगण्यात आलेलं नाही. राज्यात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यासाठी राज्याला तयारी करावी लागेल. ही तिसरी लाट लहान मुलांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वैद्यकीय सुविधा तयार ठेवाव्या लागतील, असं त्यांनी सांगितलं आहे.

अकोल्यातील व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याकडेही त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर अनेक नेते काहीच करत नाहीत. ते फक्त कांगावा करत आहेत. केवळ निकृष्ट, निकृष्ट असल्याचं सांगत आहेत. मोदींनी राज्याला व्हेंटिलेटर दिले नसते तर काय झाले असते? अकोल्यात टेक्निशियन दिला आणि लगेच व्हेंटिलेटर सुरू झाले. टेक्निकल गोष्टी कशाही डम्प केल्या की त्या सुरू होणार नाहीत, असंही ते म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते नाना पटोले?

काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधींना पत्र लिहीण्याऐवजी फडणवीसांनी नमामी गंगेला शवामी गंगे बनविणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, गोव्यात ऑक्सिजन अभावी रूग्ण तडफडून मरत आहेत त्या गोव्याचे मुख्यमंत्री, गुजरातमध्ये लाखो लोकांच्या मृत्यूचे आकडे लपवले जात आहेत त्या गुजरातचे मुख्यमंत्री आणि या सर्वांचे पालक ज्यांच्या गलथानपणामुळे देशात कोरोना स्थिती बिकट झाली आहे त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहायला हवे होते, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

याला सर्वस्वी केंद्रातील भाजप सरकारचा अहंकार आणि गलथानपणा जबाबदार आहे. सोनियाजी गांधी यांना पत्र लिहून देशाचे स्मशान बनविणा-या नरेंद्र मोदींच्या पापावर पांघरून घालण्याचा प्रयत्न फडणवीस करत आहेत. त्यांनी मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस दाखवावे, असे घणाघाती उत्तर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काही लोकांना हौस असते आंदोलन करण्याची ! अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा

News Desk

शेतकऱ्यांना जुन्याच भावाने खत उपलब्ध केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन

News Desk

खुशखबर! देशात ऑगस्टपासून मुलांच्या लसीकरणाला प्रारंभ

News Desk