HW News Marathi
महाराष्ट्र

“नागपूरमध्ये जे काही करायचं आहे ते केलं आहे”, फडणवीसांचे प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर

मुंबई | राज्यात कोरोनाचं संकट असून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दौरा करत स्थितीचा या आढावा घेत आहेत. यावरुन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली असून राज्यभरात वणवण फिरण्यापेक्षा नागपुरात बसावं असा टोला लगावला आहे. कोला येथील शासकीय विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी नागपुरात राहूनच काम करण्याचा सल्लाही दिला. दरम्यान त्यांच्या या सल्ल्यावर देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडवणीस कोपरगाव येथील आत्मा मालिक ज्ञानपीठच्या संजीवनी कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करण्यासाठी पोहोचले होते. प्रकाश आंबेडकरांनी दिलेल्या सल्ल्याबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “प्रकाश आंबेडकर यांनी चांगला सल्ला दिला आहे. मी आधीच हे सुरु केलं आहे हे त्यांना माहिती नसावं. नागपूरमध्ये जे काही काम करायचं आहे ते केलं आहे. नागपुरला ऑक्सिजनची गरज होती, तोदेखील आणला आहे. वेगवेगळ्या रुग्णवाहिका तसंच सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. प्रकाश आंबेडकर यांना माहिती नसावं, त्यामुळे ही माहिती आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू”.

प्रकाश आंबडेकर काय म्हणाले होते?

“फडणवीसांनी राज्यभरात वणवण फिरण्यापेक्षा आणि करोना मुद्द्यावर इतरांना पत्र लिहिण्यापेक्षा नागपुरातच बसावं. फडणवीस यांनी नागपुरातच राहून चार-पाच कोविड सेंटर उभारावेत,” असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी फडणवीसांना दिला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कौशल्य प्रशिक्षण संस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी दर २ महिन्यांनी संस्थांचा जनता दरबार! – मंगलप्रभात लोढा

Aprna

भाजपमध्ये अस्वस्थता नाही, नाथाभाऊंनी तिकडे गेल्यावर तरी खरं बोलावं!

News Desk

सिमेंट रस्त्यावर पुन्हा रस्ता

News Desk