HW News Marathi
महाराष्ट्र

मुस्लिम नागरिक ४ विवाह करु शकतात मग… महाराष्ट्र करणी सेनेचा सवाल 

नवी मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना २ पत्नींसंदर्भातील द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू होऊ शकत नाही. धनंजय मुंडे यांनी कायद्याचे उल्लंघन केले नाही, असं म्हणत महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी पाठराखण केली आहे. मुस्लिम नागरिक ४ विवाह करु शकतात, मग हिंदू व्यक्तीने दुसरे लग्न केले, तर चुकीचे काय? असा सवाल सेंगर यांनी विचारला आहे. भारताच्या राज्यघटनेने सर्व धर्म समभाव तत्त्व स्वीकारले आहे. तेव्हा द्विभार्या प्रतिबंधक कायदा निरर्थक ठरला आहे. त्यामुळेच सर्व धर्मांना विवाह बंधनाचे वेगवेगळे कायदे असू शकत नाहीत, असले तरी ते निरर्थक ठरतात, फक्त हिंदू धर्मीयांनाच द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू होऊ शकत नाही. कारण राज्यघटना सर्व धर्म समभाव आहेत, असं अजय सिंह सेंगर म्हणाले.

मुस्लिम ४-४ विवाह करु शकतात, मग हिंदू व्यक्तीने दुसरे लग्न केले, तर चुकीचे काय? पहिल्या पत्नीपासून सकारात्मक सुख मिळत नसेल, तर मुस्लिमांप्रमाणे हिंदू दूसरे लग्न करु शकतात, असं मत महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी व्यक्त केलं. द्विभार्या प्रतिबंधक कायद्याचे बंधन मुस्लिम, ख्रिस्ती धर्मीयांना का नाही? असा सवालही सेंगर यांनी विचारला. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये करुणा शर्मा यांच्याशी लग्न केल्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. करुणा शर्मा आपली पत्नी असल्याचा कोणताही दावा त्यांनी केलेला नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केल्यानुसार त्यांचे एकच लग्न झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीपीएल रेशनकार्ड धारकांची क्रुर चेष्टा, मिळणार फक्त अर्धा किलो साखर

News Desk

महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांशी मुख्यमंत्री टप्प्याटप्प्याने बोलणार – अनिल परब

News Desk

मराठा समाजाला EWSमध्ये आरक्षण देण्याच्या निर्णयाचे स्वागत – विनायक मेटे

News Desk