HW News Marathi
महाराष्ट्र

आपली खरीप पिकं आता सुरक्षित राहणार !

बीड | बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाच्या विमा संरक्षणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्य सरकारने केलेल्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय कृषी विभागाने त्याबाबत मान्यता दिली आहे. पीक विमा संरक्षण मंजुरीचा आदेश प्राप्त झाला असल्याची माहिती बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी (AIC)च्या माध्यमातून बीड जिल्ह्यात पीकविमा योजना राबवली जाणार आहे. या मंजुरीचा आदेश प्राप्त झाला आहे. माझ्या शेतकरी बांधवांना पीकविम्याचे संरक्षण मिळणार याचे समाधान वाटते आहे, असे ट्विट देखील त्यांनी केले आहे.

 

गेल्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी विम्याच्या ४ हजार २०० कोटी रुपयांपैकी ३ हजार ६५६ कोटी रुपये जमा केल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली होती. गेल्या हंगामात १० लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नसून त्यातील साडेसात लाख शेतकरी मराठवाडय़ातील असल्याचे धनंजय मुंडे यांनी या आधी सांगितले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात कमाल तापमानात वाढ, मुंबईकर हैराण

News Desk

इंदुरीकर महाराजांच्या अडचनीत वाढ, औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल

News Desk

दबावतंत्र करायचं असेल तर शक्तीप्रदर्शनासाठी जागा पुरणार नाही, पंकजांचं सूचक वक्तव्य

News Desk