HW News Marathi
महाराष्ट्र

अर्णब गोस्वामींची लवकर सुटका व्हावी यासाठी राम कदमांची सिद्धिविनायक मंदिरापर्यंत पदयात्रा

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांची सुटका व्हावी म्हणून उपोषण करणारे भाजपचे आमदार राम कदम आता अर्णव यांच्या सुटकेसाठी थेट सिद्धिविनायकाला साकडे घालणार आहेत. राम कदम हे घाटकोपर येथील त्यांच्या निवासस्थानापासून ते प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरापर्यंत पदयात्रा करणार असून अर्णव यांच्या सुटकेनंतरच दिवाळी साजरी करणार असल्याचं कदम यांनी म्हटलं आहे.

अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक झाल्यानंतर त्यांची रवानगी थेट तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. अर्णव यांना अटक केल्यामुळे भाजपने तीव्र संताप व्यक्त केला असून भाजप नेते आणि कार्यकर्ते या अटकेच्या निषेधार्थ रोज आंदोलन करत आहेत. भाजपचे आमदार राम कदम हे सुद्धा अर्णव यांच्या सुटकेसाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन करून सरकारचा निषेध नोंदवत आहेत. २ दिवसांपूर्वी राम कदम यांनी मंत्रालयासमोर उपोषण सुरू केलं होतं. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं होतं.

अर्णब यांना करण्यात आलेली अटक चुकीची आहे. त्याचा आम्ही विरोध करत आहोत. या अटकेचा सर्वचस्तरातून विरोध होत आहे, असं सांगतनाच ज्या दिवशी अर्णव यांची सुटका होईल, त्याच दिवशी आम्ही दिवाळी साजरी करू, असं कदम यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र सरकारला ऐनकेनप्रकारे अर्णब यांना या प्रकरणात अडकवायचे आहे. त्यामुळेच त्यांची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली असून येत्या काळात ठाकरे सरकारला त्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा कदम यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुलींना दत्तक घेण्यात महाराष्ट्र प्रथम

News Desk

जळगावात राष्ट्रवादीच्या बैठकीला भाजपच्या नगराध्यक्षाची हजेरी!

News Desk

“सरकार प्रत्येक गोष्टीत मोदींकडे बोट दाखवतं, बायकांनी मारलं तरी ते मोदीजींनी केलं म्हणतील” फडणवीसांचा टोला

News Desk