HW News Marathi
महाराष्ट्र

काही जण पराभवाचे वर्ष साजरे करायलाच बीड मध्ये येतात, धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर हल्ला बोल

बीड | काही जण पराभवाचे वर्ष साजरे करायलाच बीड मध्ये येतात. वर्षभरात या मातीतल्या माणसांची कुणाला आठवण होत नाही.कोरोनाच्या संकटात घरामध्ये बसले संकटाच्या काळात मदतीला नाही आले, असे म्हणत नाव न घेता पंकजा मुंडेना टोला लगावला. तसेच आम्ही सुद्धा 2014 मध्ये पराभूत झालो पण जनतेला वाऱ्यावर सोडलं नव्हतं अस म्हणत धनंजय मुंडेंनी टीका केली आहे.

केज येथील येडेश्वरी साखर कारखाना च्या 20-21 च्या गाळप हंगाम उद्घाटन सोहळा कार्यक्रम ते बोलत होते. ऊसतोड मजूर महामंडळातुन मोठी मदत करणार. उसतोड मजूर दुसऱ्याच्या रानात जाणार नाही. यासाठी मोठी मदत करणार आहे ऊसतोड मजूर ऊस उत्पादक शेतकरी झाला पाहिजे.यासाठी प्रयत्न करणार आहे. बजरंग सोनवणे यांनी सात वर्षात कारखाना फेडला.सात वर्षात आमच्या वैद्यनाथ कारखान्यात अडीचशे कोटी कर्ज वाढलं, असे म्हणतात तरी सुद्धा ऊस उत्पादक शेतकऱ्याचा ऊस पडू नये म्हणून आम्ही राजकरण न करता थक हमीची जबाबदारी घेतली.

मांजरा धारण 70 % जमीन, बीड 30 %, उस्मानाबाद धरण तीन जिल्ह्यासाठी सर्वाधिक फायदा बीडला झाला पाहिजे. थेंब ना थेंब जास्त मिळून देणार, असे ते म्हणाले. ऊसतोड मजुरांना राज्यसरकार योग्य दरवाढच करेल. जाणीवपूर्वक ऊसतोड मजूर महामंडळ माझ्या विभागाकडे घेतलं. विशेष सहाय्य करून ऊसतोड मजुरांचे कायमचे प्रश्न सोडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे धनंजय मुंडे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेच्या आमदारांशी बातचीत केल्यानंतर मुख्यमंत्री राष्ट्रवादीच्या आमदारांना भेटणार!

News Desk

डोंगरांतील गावांचे सर्वेक्षण करून पुनर्वसन करा, रामदास आठवलेंकडून तळीये दुर्घटनास्थळाची पाहणी!

News Desk

परमबीर सिंग यांना सचिन वाझे प्रकरण भोवणार ? मुंबई पोलीस आयुक्त बदलणार?

News Desk