HW News Marathi
महाराष्ट्र

नवाब मलिकांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा – जयकुमार रावल

धुळे | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकला असल्याची माहिती पर्यटनमंत्री आणि पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिलीआहे. ‘एखादा प्रकल्प जाहीर झाला की, शेतकऱ्यांकडून कवडीमोलाने जमीन विकत घेतात. ज्या ठिकाणी प्रकल्प येतात त्या ठिकाणी जमीन खरेदी करुन वाढीम मोबदला घेण्याचा प्रकार रावल करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. ’ धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन रावल यांच्यावर हे आरोप केले.

धुळ्याचे शेतकरी धर्म पाटील यांच्या अंत्यसंस्कार झाल्यानंतर माध्यमाशी बोलताना पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की, नवाब मलिकांविरोधात दोंडाईच्या कोर्टात अब्रू नुकसानीदा दावा ठोकला आहे. ‘माझ्या आजोबांनी ही विविध प्रकल्पासाठी जमीन दिल्या आहेत.’असे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी म्हटले.

सरकारारी अधिकाऱ्यांना निराश होऊन धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला असून पाटील यांना महेंद्र आणि नरेंद्र अशी दोन्ही मुले आहेत. पाटील यांच्या अंत्यसंस्कारा वेळी धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल देखील उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मला माझं वय ४५ वर्षांच्या पुढे का नाही याची खंत वाटतेय!”

News Desk

राष्ट्रवादीच्या नेत्यांचे गर्दीचे कार्यक्रम सुरु, आमच्यावर गुन्हा का? पंकजा मुंडेंचा सवाल

News Desk

मराठा आरक्षणाचा मोर्चा थेट हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनावर धडकणार

News Desk