HW News Marathi
Covid-19

“४०% मुंबईकर स्वबळावर कोरोनामुक्त झाले का ?”, आशिष शेलारांची टीका  

मुंबई | देशातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच सुरुवातीपासून मुंबई हा कोरोनाचा हॉटस्पॉट राहिला आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांचा सातत्याने वाढणारा आकडा ही निश्चितच अत्यंत गंभीर बाब आहे. दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबईतील या कोरोनास्थितीवरून राज्य सरकारवर आणि मुंबई महानगरपालिकेवर निशाणा साधला आहे. “४०% मुंबईकर स्वबळावर कोरोनामुक्त झाले का ?”, असा सवाल आशिष शेलार यांनी महानगरपालिकेकडे उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे, “१ लाख अँटीबॉडी टेस्ट्स करा म्हणजे खरं समोर येईल”, अशी मागणी देखील आशिष शेलार यांनी केली आहे.

एका सर्व्हेतून समोर आलेल्या माहितीनुसार, “मुंबईतील झोपडपट्टी परिसरात सरासरी साधारणतः ५७% नागरिकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. म्हणजेच या परिसरातील तब्बल ५७% लोकांना याआधीच कोरोना होऊन गेला आहे. तर झोपडपट्टी परिसर वगळता अन्य भागातील सरासरी साधारणतः १६ % नागरिकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत.” याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेला धारेवर धरले आहे. “आवश्यकता होती तेव्हा चाचण्या वाढवल्या नाहीत. आता चाचण्या वाढवून कोरोना होऊन गेला सांगता? यात तुम्ही काय करुन दाखवले?”, असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजभवनातील हवा-पाणी गढूळ होणार नाही, आम्हाला खात्री !

News Desk

मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने ‘या’ कारणासाठी घेतली शरद पवारांची भेट

News Desk

राज ठाकरे यांनी सरकारला आर्थिक घडी सावरण्यासाठी दिला ‘हा’ सल्ला

News Desk