HW News Marathi
महाराष्ट्र

मनसुख हिरेन प्रकरणाचा गुंता सुटला !ATS DIG शिवदीप लांडेंच्या फेसबुक पोस्टने खळबळ …

मुंबई | एकीकडे राज्यात सचिन वाझेंना महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आदेश दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केल्याने सरकार आणि राष्ट्रवादीची भांबेरी उडालेली असताना दुसरीकडे मनसुख हिरेन प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आलेला पोलीस विनायक शिंदे आणि बुकी असलेला नरेश गोर याला महाराष्ट्र ATSने अटक केली आहे. त्यानंतर राज्याच्या ATSचे DIG शिवदीप लांडे यांनी फेसबुक पोस्ट करून अत्यंत संवेदनशील मनसुख हिरेन खून प्रकरणातील गुंता सुटला असल्याची माहिती दिली आहे.

शिवदीप लांडे यांनी या फेसबुक पोस्टमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून रात्रंदिवस एक करून याप्रकरणी न्याय्य पद्धतीने काम केलेल्या माझ्या एटीएस पोलिस दलाच्या सर्व सहकार्यांना मी मनापासून अभिवादन करतो. माझ्या पोलिस कारकीर्दीची आजपर्यंतची ही सर्वात जटिल घटना होती. असे नमूद केले आहे. सचिन वाझे यांचा ताबा एटीएसला हवा आहे. त्यासाठी सचिन वाझे यांच्याविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा एटीएसने कोर्टात केला आहे. एटीएसच्या या दाव्यामुळे सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरसंघचालक मोहन भागवतांचे नाव दहशतवाद्यांच्या यादीत ?

News Desk

इस्लामपूरच्या सीमा सील करण्यात आल्या – जयंत पाटील

swarit

“अंगावर याल तर शिंगावर घेऊच” दादरच्या भाजप-सेना राड्यावर महापौरांची प्रतिक्रिया

News Desk