HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेसचे मंत्री आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार, आपली बाजू मांडणार

मुंबई | काँग्रेसच्या नेत्यांना निर्णय प्रकियेत सहभागी करून घेतले जात नाही, यामुळे काँग्रेस नेते नाराज आहे. काँग्रेस नेते आपली बाजू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज (१८ जून) दुपारी दीड वाजता काँग्रेस नेत्यांची भेट घेणार आहेत.

यापूर्वी शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार अनिल देसाई यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची काल (१७ जून) भेट घेतली आहे. बाळासाहेब थोरात यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी अनिल देसाई यांनी जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

बाळासाहेब थोरात यांच्यापाठोपाठ काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी महाविकासआघाडीवर नाराजी व्यक्त केली. “नोकरशहा महाविकसाआघाडीत भांडणे लावत आहेत,” असा आरोप एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.

सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसवर टीका

काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे. सत्तेचा अमाप लोभ उद्धव ठाकरे यांना नाही. राजकारण हे अखेरीस सत्तेसाठीच असते व सत्ता कोणाला नको असे नव्हे, पण ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही. खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करू नये, अशी टीका केली होती.

संबंधित बातम्या

शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी घेतली बाळासाहेब थोरात भेट, मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वीच नाराजी दूर ?

नोकरशहा महाविकसआघाडीत भांडणे लावत आहेत | अशोक चव्हाण

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पाडून दाखवा सरकार” हे मंत्री आहेत की,भांडखोर सासूबाई?” – शेलारांचा टोला

News Desk

#Vidhansabha2019 : राज्यात १५०४ उमेदवारांनी घेतले अर्ज मागे

News Desk

गोव्यात आघाडी सरकारची उभारणी करण्यासाठी शरद पवारांना मध्यस्थीसाठी विचारणार – दीपक केसकर

News Desk