HW News Marathi
महाराष्ट्र

ठाकरे सरकार-राज्यपाल वाद पुन्हा नव्या विषयावरुन पेटला, राज्यपालांना सरकारी विमान नाकारलं

मुंबई | राज्यात राजकारणात अनेक विषयांवरुन गोंधळ सुरुच आहे. आथा यात एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. ठाकरे सरकार आणि राज्यपाल यांच्यातला वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सरकारी विमानानं प्रवास करायला परवानगी नाकारली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं विमानात बसलेल्या राज्यपालांना खाली उतरावं लागलं. आता राज्यपाल खाजगी विमानाने उत्तराखंडला जाणार असल्याची माहिती आहे.

यावरुन भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तांत्रिक कारणामुळं परवानगी नाकारली असावी असं म्हटलं आहे. या संदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मला याबद्दल काही माहीत नाही. आपण जे सांगितलं त्याबद्दल माहिती घेतो आणि सांगते असं म्हटलं आहे. तर महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या बबात माहिती घेऊन वक्तव्य करणार असल्याचे सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंडकडे जात होते. त्यावेळी ते सरकारी विमानाने निघाले होते. मात्र राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं विमानात बसलेले राज्यपाल खाली उतरले. आता ते खाजगी विमानाने उत्तराखंडला जाणार असल्याची माहिती आहे. यावर बोलताना विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, राज्यपालांना परवानगी नाकारणे ही सूडभावना आहे. ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. लोकशाहीच्या नियमांची पायमल्ली करणारी ही घटना आहे, असं दरेकर म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सचिन वाझे सरकारचा जावई आहे का?”, प्रविण दरेकरांचा सवाल

News Desk

MPSC बाबत मुख्यमंत्री लवकरचं मोठी घोषणा करणार!

News Desk

नवरात्रीत मिळणार राज्याच्या राजकारणाला कलाटणी

News Desk