HW News Marathi
महाराष्ट्र

‘गिर गये तो भी टांग उपर’ शिवसेनेचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा! 

मुंबई | सिंधुदुर्गाच्या वैभववाडी नगरपंचायतमधील ६ भाजप नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समक्ष शिवेसेनेत प्रवेश केला होता. ६ नगरसेवकांना शिवसेनेत सामील केल्याने भाजपला हा मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आले होते. त्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली होती. त्या टीकेला शिवसेनेने नगरसेवकांना शिवसेनेत सामील करुन उत्तर दिले. आता याच मुद्द्यावरुन भाजप आणि शिवसेनेत राजकीय घमासान सुरु आहे.

“सिंधुदुर्गातल्या वैभववाडीतले ६ नगरसेवक अमित शाहांच्या पायगुणानं गेले नाही. पण ते नगरसेवक गेले म्हणजे भाजपचं पुन्हा सरकार येणारच नाही, असं नाही. तर शाहांच्या पायगुणानं सरकार येणारच”, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यांच्या वक्तव्याला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“गिर गये तो भी टांग उपर, असं भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचं आहे. वैभववाडीत भाजप खासदार नारायण राणे पुरस्कृत सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे आणि त्यांच्या कुटुंबीयांना कंटाळून हे सगळे नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झाले आहेत. भविष्यात येणारी जी निवडणूक आहे या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना आणि महाविकासआघाडी ही स्वतःची प्रचंड ताकद दाखवून देईल”, अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटी महामंडळाला १५ कोटीचे नुकसान, कर्मचाऱ्यांचा आजही संप सुरुच

News Desk

राज ठाकरेंना प्रसिद्धीची गरज आहे, त्यामुळे ते असे निराधार आरोप करतायत, राष्ट्रवादीचा मनसेवर पलटवार

News Desk

माझ्यासाठी आपला सर्वांचा जीव महत्वाचा, राज्याभिषेक सोहळा घरीच साजरा करा

News Desk