HW News Marathi
महाराष्ट्र

चंद्रकांत खैरे-अब्दुल्ल सत्तार यांच्यातील वाद संपला, सर्व गैरसमज दूर झालेत !

मुंबई | माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि ग्रामविकास मंत्री अब्दुल्ल सत्तार यांच्यातील वाद संपला, सर्व गैरसमज दूर झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करणार, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. खैरे-सत्तार या दोघांमधील गेल्या दोन दिवसांपासून अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. यानंतर आज (६ जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत हे दोन्ही नेते आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकी पार पडली.

मुख्यमंत्र्यांनी या दोघांमधील वाद जाणून घेत, या नेत्यांना पक्षासाठी एकत्र काम आणि पक्षाची शिस्त पाळण्याचे आदेश पाळण्याचे देण्यात आले आहे. आणि आता दोघांमध्ये कुठलाही वाद-विवाद नाही. असे म्हणत शिंदेंनी दोन्ही नेत्यांना माध्यमांसमोर हातात घालत फोटो काढत मनोमिलन झाल्याचे चित्र स्पष्ट दाखविले.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आघाडी सरकारच्या काळात सिडकोला जमीनी दिल्या | मुख्यमंत्री

News Desk

सारंगखेडा चेतक महोत्सव २०१८-१९च्या तिसऱ्या पर्वाचे आयोजन

News Desk

इगोपोटी राज्य सरकारने मेट्रो कारशेडचा निर्णय घेतला -फडणवीस

News Desk