HW News Marathi
महाराष्ट्र

अशा नेत्यांची गरज आहे !

मुंबई | दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी रविवार (५ जानेवारी) रात्री जीवघेणा हल्ला झाला. यात विद्यार्थ्यां आणि प्राध्यापकांवर लाठ्या-काठ्यांनी झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे मुंबई, पुण्यासह देशाच्या विविध भागात तीव्र पडसाद उमटले. अनेक शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन, कॅंडल मार्च आणि घोषणा देत तीव्र निषेध नोंदविला. या आकस्मिक हल्ल्याची सामान्य व्यक्तींसोबतच सिनेकलाकार आणि राजकीय नेत्यांनीही सोशल मीडियाद्वारे आपले मत व्यक्त करत निषेध केला.

या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरद्वारे जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध नोंदविला आहे. आदित्य ठाकरेंनी ट्वीट करत म्हणाले की, “निषेध करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला चिंताजनक आहे. जामिया असो किंवा जेएनयू…विद्यार्थ्यांवर क्रूर बळाचा वापर केला जाऊ नये… त्या गुंडांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे” असे ते म्हणाले. या ट्विटला बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूरने उत्तम प्रतिसाद देते, आदित्यच्या ट्वीटला रिट्वीट करत म्हटले की, “अशा नेत्यांची गरज आहे, आणि नक्कीच काहीतरी बदल होईल,” असे म्हणत सोनमने त्याचे कौतुकही केले. सध्या हे ट्वीट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होता आहे.

 

 

‘जेएनयू’मधील ‘ती’ काळरात्र

दिल्लीतील जेएनयूच्या वसतीगृहात रविवारी (६ जानेवारी) अज्ञात इसमांनी मुलीच्या वसतीगृहात हल्लेखोरांनी लाठ्या-काठ्या घेऊन हल्ला चढविला. या हल्लायत जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोष यांच्यावर हल्ला झाला. या हल्लायत त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. जेएनयूच्या विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अज्ञात हल्लेखोरांनी चेहऱ्यावर मास्क लावले होते. मास्क घालून हातात लोखंडी रॉड, हॉकी स्टीक आणि काठ्या त्यांनी अचानकपणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. या प्रकरणाची गृहमंत्री अमित शाह यांनी दखल घेतली असून दिल्ली पोलीस आयुक्तांकडून प्रकरणाची माहिती घेतली. सोबतच या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरपीआयला महाराष्ट्रात उमेदवार उभे करता येत नाही .. विलास गरुड 

News Desk

अॅड गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Aprna

नोकरीसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक

News Desk