HW News Marathi
महाराष्ट्र

जिवंत बाळाला केले मृत घोषित, जालना जिल्हातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा

जालना | जालना जिल्ह्यातील आष्टीतल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका गर्भवतीला तुमच्या बाळाचा पोटातच मृत झाला आहे. त्यामुळे बाळ काढण्यासाठी शहरातील रुग्णालयामध्ये जावे लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र, गाडीने रूग्णालयात जात असताना रस्त्यातच महिलेची डिलिव्हरी झाली आणि बाळ सुखरुप जन्माला आले. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचा हलगर्जीपणा समोर आला आहे. डॉक्टरांनी केलेल्या या हलगर्जीपणावरून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईक करीत आहे.

परतूर तालुक्यातील वाहेगाव येथे राहणारे जगताप कुटुंब. आपल्या गर्भवती मुलीच्या पोटात त्रास होत असल्याने त्यांनी मुलीला आष्टीतल्या सरकारी रूग्णालयात दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याची माहिती महिलेच्या कुटुंबीयांना सांगितली बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याचे ऐकून नातेवाईकांना धक्का बसला. त्यानंतर महिलेचे प्राण वाचवायचे असतील तर बाळाला बाहेर काढावे लागेल, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

सदर कुटुंबीय आपल्या मुलीला घेऊन गाडीने दुसऱ्या रूग्णालयात जात असतांना रस्त्यातच महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सध्या महिलेची आणि बाळाची प्रकृती उत्तम आहे. घडलेल्या प्रकारावर महिलेच्या नातेवाईकांनी हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेष बाब म्हणजे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जिल्हातील ही घटना असल्याने आता या डॉक्टरावर काय कारवाई करण्यात येते हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते राज ठाकरेंना प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तकं करणार कुरिअर!

News Desk

या शिवमंदिरात फडकवला जातो तिरंगा !

News Desk

मुख्यमंत्र्यांचे खास नेता ईडीच्या रडारवर; चंद्रकांत पाटलांनी घेतलं नाव

News Desk