HW News Marathi
महाराष्ट्र

अंघोळीची गोळी संस्थेला ‘दिव्यरत्न राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

पुणे | दिव्या फाऊंडेशन, बुलढाणा यांच्या वतीने महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रात समाजभान जपणाऱ्या तरुणाईला दिव्यरत्न राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार देण्यात येत असतो. प्रेम, बंधुभाव, त्याग आणि बचत ही तत्व स्वीकारून पुण्यातील अंघोळीची गोळी ही संस्था पाणी बचत आणि वृक्ष संवर्धन या विषयावर सातत्याने काम करत आहे. याच कामांची दखल घेत दिव्या फाऊंडेशन, बुलडाणा यांच्या वतीने देण्यात येणारा दिव्यरत्न राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार यावर्षी ‘अंघोळीची गोळी’ संस्थेला नुकताच जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील पाणी बचत आणि वृक्ष संवर्धन करणाऱ्या या तरूणाईचा होणार गौरव होणार आहे.

झाडांना देखील संवेदना असतात त्यामुळे झाडांना ठोकले जाणारे बॅनर, पोस्टर आणि खिळे काढण्याची अनोखी मोहीम अंघोळीची गोळी या संस्थेने सुरु केली होती. अगदी अल्पावधीतच ही मोहीम व्यापक पद्धतीने महाराष्ट्रभर पसरली होती. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात विविध सामाजिक संस्था आणि युवकांच्या गटांच्या मदतीने खिळेमुक्त झाडे ही मोहीम आज सुरु आहे. पुण्याच्या माधव पाटील यांनी सुरु केलेली अंघोळीची गोळी ही संस्था सध्या प्रेम, बंधुभाव, त्याग आणि बचत या तत्वांचा प्रसार करून पाणी बचत आणि वृक्ष संवर्धनासाठी काम करत आहे.

“पुरस्कार मिळाल्याचा आनंद नक्कीच आहे मात्र पर्यावरण संवर्धनाच्या कामात सर्वसामान्य जनतेने उतरणे अत्यंत आवश्यक आहे. पण त्याचबरोबर पर्यावरणपुरक जीवनशैलीचा अंगिकार करणे ही देखील प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असे मुंबईच्याअंघोळीची गोळी टीम म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरांवर १ जानेवारी हा दिवस अंघोळीची गोळी म्हणजेच पाणी बचत करण्याचा दिवस म्हणुन साजरा व्हावा यांसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“आगे आगे देखो होता है क्या”, गिरीश महाजनांचे सूचक ट्विट

News Desk

नाना पटोलेंचाही फोन टॅप, बाळासाहेब थोरात यांचा गंभीर आरोप

News Desk

‘पेगासिस’ची चिंता सोडा, ‘पेंग्विनची’ चिंता करा; चित्रा वाघ यांचं राऊतांवर हल्ला

Jui Jadhav
महाराष्ट्र

सिंधुताई सपकाळ यांना महाराणी अहिल्याबाई होळकर नारीशक्ती पुरस्कार जाहीर

Gauri Tilekar

पुणे | ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, अनाथांची माय अशी उपाधी प्राप्त झालेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांना महाराणी अहिल्याबाई होळकर नारीशक्ती पुरस्कार जाहीर झाला आहे. १४ ऑक्टोबरला या शानदार सोहळ्यात सिंधुताईंचा या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. अनाथ मुलांचा सांभाळ करत त्यांच्या जीवनाला दिशा देण्याचे काम सिंधुताई यांनी केले आहे. यासाठी त्यांनी ‘ममता बाल सदन संस्थे’ची स्थापना केली होती.

१९९४ साली पुणे येथील पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथे त्यांनी ही संस्था सुरु केली. या संस्थेच्या मार्फत सिंधुताईंनी अनेक अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला आहे. सिंधुताई सपकाळ यांनी या संस्थेच्या प्रचारासाठी आणि निधी गोळा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देखील हजेरी लावली आहे. यासाठी त्यांनी मदर ग्लोबल फाउंडेशन संस्थेची देखील स्थापना केली आहे. सिंधुताईंच्या जीवनावर आधारीत एक सिनेमा देखील आला आहे.

Related posts

दरड सत्र सुरूच, रायगडमधील हिरकणी वाडीत दरड कोसळली..!

News Desk

अनिल परब यांना तिसरा धक्का! राज्यपालांनी दिले हे आदेश

News Desk

सचिन वाझेंचा NIA कोर्टात जामिनासाठी अर्ज

News Desk