HW News Marathi
महाराष्ट्र

हतबल होऊ नका, शासन तुमच्या सोबत आहे

  • गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना ना. दिवाकर रावते यांची ग्वाही
  • कोयाळी येथे गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी
  • शेतकऱ्यांशी संवाद साधून घेतली नुकसानाची माहिती

वाशिम | अवेळी झालेला पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून शासनाने मदत जाहीर केली आहे. केंद्र सरकारकडूनही मदत मिळविण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. गारपिटीमुळे शेतकऱ्यांवर कोसळलेल्या संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांनी हतबल न होण्याचे आवाहन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज केले. रिसोड तालुक्यातील कोयाळी (जाधव) येथे गारपिटीने झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या कृषि व पशुसंवर्धन समितीचे सभापती विश्वनाथ सानप, तहसीलदार आर. यू. सुरडकर, रिसोड पंचायत समितीचे उपसभापती महादेव ठाकरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. सर्वप्रथम श्री. रावते यांनी कोयाळी येथील शेतकरी विठ्ठल शेळके यांच्या हरभरा पिकाचे गारपिटीने झालेल्या नुकसानाची शेतात जाऊन पाहणी केली. तसेच परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना श्री. रावते म्हणाले, गेल्या काही वर्षांमध्ये हवामानातील बदलांमुळे अवेळी पाऊस, गारपिटीचे संकट वारंवार येत असून त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. आताही गेल्या दोन-तीन दिवसात विदर्भ, मराठवाड्यात झालेल्या गारपिटीने गहू, हरभरा पिकांसह फळबागांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानाची शासनाला जाणीव असून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आपण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधत असल्याचे श्री. रावते यांनी यावेळी सांगितले.

शासनाने एनडीआरएफच्या नियमानुसार शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर केली असून ही मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत. तसेच केंद्र सरकारकडूनही २०० कोटी रुपयांची मदत मिळविण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांवर येणाऱ्या प्रत्येक संकटात त्यांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य शासन नेहमीच कटिबद्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही संकटामुळे हतबल होऊ नये, असे आवाहनही रावते यांनी यावेळी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘महाराष्ट्रात लसीसाठी राजकारण करणाऱ्यांना भिडेंच्या भाषेत….’ संजय राऊतांच भाजपवर निशाणा!

News Desk

अजित पवारांनी सत्तेचा गैरवापर करुन कारखाना मिळवला, शालिनीताई पाटलांचा आरोप

News Desk

नव्या वर्षात पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाची विजयी पताका फडकली!

Aprna