HW News Marathi
महाराष्ट्र

Dongri Building Collapsed : लोकांच्या आयुष्याची किंमत नसलेले लोक सत्तेवर !

मुंबई | “डोंगरी येथील ही घटना दुर्दैवी आहे. लोकांच्या आयुष्याची किंमत नसलेले लोक सत्तेवर आहेत. दुसऱ्याच्या घरी मृत्यू तांडव घालत असताना आपल्याला काही वाटत नसेल तर आपण असंवेदनशील आहोत”, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. मुंबईच्या डोंगरी भागात केसरबाई ही ४ मजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत तब्बल ४० ते ५० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला असून ८ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर ही टीका केली आहे.

“मुंबईमध्ये अशा घटना वारंवार घडणे ही मुंबईसाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इथे लोकांच्या आयुष्याची काहीही किंमत नाही. ही फक्त एक दिवसाची बातमी आहे. पण त्याचे पुढे काय होणार ? मालाडची दुर्घटना ही दुर्दैवी होती. गेल्या दोन महिन्यांमध्ये झालेल्या दुर्घटनेत तब्बल १०० ते २०० जण मृत्यूमुखी पडले आहे. आता त्यांचे पुढे काय ?, असा मनाला प्रश्न सतावतोय. परंतु, आता पुढे काहीच होणार नाही”, असे जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझ्या वाढदिवसाला शुभेच्छांचे होर्डिंग्ज नको !

News Desk

MarathaReservation | राज्यांनी वेळ वाढवून मागितल्यावर कोर्टानं १ आठवड्याचा दिला वेळ

News Desk

आयुक्त संजय पांडे यांचा हस्ते पात्र सहायक पोलीस उप निरीक्षकांना पदोन्नती

Aprna