HW News Marathi
महाराष्ट्र

चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर समीर वानखेडेंविरोधात घोषणाबाजी

मुंबई | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमत्ताने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दादर चैत्यभूमीवर जावून अभिवादन केले. वानखेडेंनी अभिवादन करून जाताना भीमशक्ती रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी वाखेडेविरोधात घोषणाबाजी केली.

“आज जो लढा सुरू आहे. त्यासाठी मला इथे प्रोत्साहन मिळते,” असे वानखेडेंनी माध्यमांशी बोलताना म्हणाले. दरम्यान, भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष अनिल दगडू कांबळे म्हणाले, “वानखेडेंना चैत्यभूमीवर येण्याचा नैतिक अधिकार नाही.” यावेळी वानखेडेंनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती प्रसार माध्यमांतून मिळाली आहे. या दोघांमध्ये नेमके काय चर्चा झाली हे अद्याप कळू शकले नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा प्रत्येकालाच अधिकार असून कोणत्याही धर्माचा जातीचा असो. परंतु काही लोक येथे येण्यास नव्याने सुरुवात झाली आहे. मी माझा संघर्ष सुरू केली हा जयभीम इम्पॅक्ट आहे, असा टोला अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नाव न घेता वानखेडेंना टोला लगावला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या…राष्ट्रपती राजवट म्हणजे काय ?

News Desk

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर बदली!

News Desk

नांदगाव येथील राख तलाव बाधित रहिवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करणार! – आदित्य ठाकरे

Aprna