HW News Marathi
महाराष्ट्र

डॉ. आंबेडकराचे परळमधील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित

मुंबई | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज (६ डिसेंबर) ६३ वा महापरिनिर्वाण दिन आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर भीमसागर लोटला आहे. या दिनानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मंत्री जयंत पाटील यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. महामानवाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखोचा अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर एकत्र आले आहेत.

चैत्यभूमीवर अभिवानद केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परळ येथील बीआयटी चाळीत आले होते. परळ दामोदर हॉलजवळील बीआयटी चाळ येथील इमारतीत दुसर्‍या माळ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर राहत होते. १९१२ ते १९३४ या कालावधीत २२ वर्षे त्यांचे येथे वास्तव्य होते. हे निवासस्थान देखील राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी या चाळीला भेट दिली.

https://twitter.com/ThaneNCP/status/1202632545461911552?s=20

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल (५ डिसेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून ही मागणी केली होती. आयुष्यातील अनेक महत्वपूर्ण वर्षे ज्या चाळीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घालवली. तिथून जिथे त्यांनी मनुस्मृती जाळण्याचा निर्णय घेतला, जिथून ते वर्ल्ड टेबल कॉन्फरन्सला (गोल्मेज परिषदेला) गेले. जिथे त्यांना छत्रपती शाहू महाराज भेटले. त्या खोलीचे व त्या इमारतीचे राष्ट्रीय स्मारक करावे अशी मागणी जितेंद्र आव्हाडांनी केली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप नेते गिरीश महाजन यांच्या विरोधात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल

News Desk

मुख्यमंत्र्यांनी MPSC देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे आपले लक्ष वेधावे! – गोपीचंद पडळकर

Aprna

चिपीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री कानात काय बोलले ? राणेंनी केला खुलासा

News Desk