HW News Marathi
महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई आंबेडकर यांच्या एकत्र पुतळ्याने शहराच्या वैभवात वाढ! – दत्तात्रय भरणे

सोलापूर | शहरातील विकास कामे जातपात, पक्ष यांचा विचार न करता करावीत. विकासाची कामे करताना कोणताही वाद होता कामा नये. गरिबांच्या हिताचे काम करा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाबाई आंबेडकर यांचा न्यु बुधवार पेठ येथील उद्यानामध्ये एकत्र पुतळा उभारण्याचे काम होणार आहे. असा पुतळा राज्यातील एकमेव असून यामुळे शहराच्या वैभवात वाढ होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

सोलापूर शहरातील विविध विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी भरणे बोलत होते. यावेळी विविध ठिकाणी आमदार प्रणिती शिंदे, महानगरपालिका आयुक्त पि. शिवशंकर, नगरसेवक सर्वश्री चेतन नरोटे, महेश कोठे, आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, तौफिक शेख, तौफिक हत्तुरे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री  भरणे यांनी सांगितले की, नागरिक दलितेतर योजनेंतर्गत प्रत्येक कामाला निधी उपलब्ध करून दिला आहे. शहराच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून सर्व काही करणार आहे. शहरातील नागरिकांना 24 तास पिण्याच्या पाण्यासाठी दुहेरी पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. सामान्य जनतेसाठी आपल्या खुर्चीचा उपयोग व्हावा, प्रत्येकांनी कर्तव्य म्हणून काम करावे. लोकहिताच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही भरणे यांनी दिली.

पार्क चौकातील नॉर्थ कोट मैदान सुशोभिकरण उद्घाटन, मुस्लिम पाच्छा पेठ, किडवाई चौक, जिंदाशा मदार चौक ते पद्मशाली चौक रस्ता काँक्रिटीकरण शुभारंभ, प्रभाग क्रमांक 5 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार प्रेरणा भूमी सुशोभिकरण शुभारंभ, थोरला मंगळवेढा तालिम संघाचे उदघाटन, प्रभाग क्रमांक चारमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार उदघाटन आणि नवीन बुधवार पेठ येथील उद्यानामध्ये माता रमाई आंबेडकर पुर्णाकृती पुतळा आणि परिसर सुशोभिकरणाचा शुभारंभ श्री. भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार प्रेरणा भूमी येथे पाहणी करून माहिती घेतली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातील अस्थिरता संपविण्यासाठी ‘नीळकंठ’ व्हायला आम्ही तयार !

News Desk

काँग्रेस आमदार आसिफ शेख यांना हत्येची धमकी देणारे अजून मोकाट कसे?: विखे पाटील

swarit

कोकण ते विदर्भातील जिल्ह्यांना यलो ॲलर्टक …पावसाचं कमबॅक ?

News Desk