HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यात अतिवृष्टीमुळे १० जणांचा मृत्यू, शेकडो वाहने वाहून गेली

पुणे | शहरात जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर कात्रज, सहकारनगर, बिबवेवाडी, सिहगड रस्ता परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. त्यामुळे असंख्य गाड्यांचे नुकसान झाले आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे अनेक जण अडकल्यामुळे स्थानिक लोकांकडून त्यांना मदतकार्य सुरू आहे.

दरम्यान पुण्यातल्या अरण्येश्वर भागातील टांगेवाला कॉलनीत काल (२५ सप्टेंबर) मध्यरात्री पाणी शिरले. यामुळे यात्यामुळे या कॉलनीतील अनेक घरांच्या भिंती खचल्या. या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४ जण पूराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांचा शोध सुरू आहे.

तसेच मध्यरात्री पुणे शहराचा वीजपुरवठा बंद करण्यात आला असून काही ठिकाणी विजेचे ट्रान्सफॉर्मर्स पाण्यात वाहून गेले आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. पुढील पाच दिवस शहराच्या पाणीपुरवठ्यावरही परिणाम होणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

महापालिकेकडून सांगण्यात आले आहे की, “अतिवृष्टीमुळे पद्मावती पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे सर्व पंप-मोटार नादुरूस्त झाले आहेत. परिणामी पद्मावती पंपिंग स्टेशनवर अवलंबून असणाऱ्या बिबवेवाडी, कोंढवा, मर्केट यार्ड परिसर, धनकवडी, बालाजी नगर, सहकार नगर परिसर, सातारा रोड परिसर भागांना पाणीपुरवठा होणार नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नांदेड जिल्ह्यात दोन नूतन पोस्ट ऑफिसला मान्यता 

News Desk

तरुणाचा वीजेच्या खांबावर दोन तास धिंगाणा, तारा तोडल्या

News Desk

“अण्णा हजारे इतके दिवस होते कुठे?” राज ठाकरेंचा सवाल

News Desk