HW News Marathi
महाराष्ट्र

मला वाटले हे राज्यभर बंद पाळतील, पण यांनी फक्त बारामतीत बंद पळाला !

मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. औरंगाबादमध्ये वंचितचा युवा संवाद मेळाव्यात सुजात आंबेडकर यांनी भाष्य केले. सुजात पुढे असे देखील म्हणाले, सुजात आंबेडकर म्हणाले, “संसदेत गदारोळ सुरु आहे, युएपीए कायदा आणला. अनेक दलितविरोधी कायदे आणले, त्यावेळी जाणते राजे गप्प का होते? उलट ज्या दिवशी हे कायदे संसदेत आले होते, त्या दिवशी हे जाणते राजे घरी पळून गेले होते. जाणत्या राजाला ईडीची नोटीस आली, मला वाटले हे राज्यभर बंद पाळतील, पण यांनी फक्त बारामतीत बंद पळाला”

दरम्यान, “देशातल्या सगळ्या दुर्घटनांना फक्त नरेंद्र मोदी कारणीभूत आहेत. ज्या राष्ट्रीय बँका बंद पडत आहेत, त्याला मोदी जबाबदार आहेत. या सरकारच्या कार्यकाळात इतकी कर्ज बुडवली गेली आहेत की, लोकांना आता स्वतःचे पैसे फक्त महिन्याकाठी हजार रुपये देत आहेत. ही तर सरळसरळ लूटमार आहे.”, असा हल्लाबोल सुजात आंबेडकर यांनी मोदींवर नाशाणा साधला. “स्वातंत्र्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने देशासाठी केलेले त्याग सांगावा, मग देशाला त्याग शिकवा. देशात आलेल्या आर्थिक मंदिवरुन हे सरकार आपली दिशाभूल करत आहे, असे देखील सुजात आंबेडकर यावेळी बोलत होते.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढणार, ” संभाजीराजेंची मोठी घोषणा

Aprna

कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागांत जुलैपासून टप्प्याटप्प्याने प्रत्यक्ष शाळा सुरू होणार

News Desk

राज्यपालांना भेटलं तर त्यावर विश्लेषण करण्यासाठी आपला वेळ वाया का घालवा?

News Desk